मुंबई: महाराष्ट्रातील माढा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Pm narendra modi) आज निवडणुकीच्या प्रचाराची सभा घेतली. यावेळी येथील विशाल जनसमुदायाला संबोधित करताना मोदी म्हणाले, भाजप-एनडीए सरकार महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचे काम करत आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले गेल्या १० वर्षात तुम्ही मला जेव्हापासून काम करण्याची संधी दिली मी माझ्या शरीरातील कण न कण तसेच प्रत्येक क्षण तुमच्या सेवेत अर्पण केला आहे. आज देशातील लोक, महाराष्ट्रातील लोक मोदी सरकारची १० वर्षे आणि काँग्रेस सरकारची ६० वर्षे यातील फरक बघत आहेत. काँग्रेसला जे ६० वर्षांत जमले नाही ते तुमच्या या सेवकाने १० वर्षांत करून दाखवले आहे.
पंतप्रधान पुढे म्हणाले, महाराष्ट्राची जनता जेव्हा प्रेम आणि आशीर्वाद देते तेव्हा कोणतीच कसर मागे सोडत नाही. मात्र जेव्हा कोणी दिलेले वचन पूर्ण करत नाही तेव्हा महाराष्ट्राची जनता ते लक्षातही ठेवते आणि वेळ आल्यास हिशोबही पूर्ण करते.
पंतप्रधान मोदींनी यावेळी विरोधी पक्षावर हल्लाबोल करताना म्हटले, १५ वर्षांपूर्वी एक मोठे नेते येथे निवडणूक लढवण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी मावळत्या सूर्याची शपथ घेऊन म्हटले होते की येथील दुष्काळ प्रभावित क्षेत्रापर्यंत पाणी पोहोचवू मात्र त्यांनी आपले वचन पूर्ण केले नाही. आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे.
पंतप्रधान म्हणाले, विदर्भ असो मराठवाडा असो थेंबथेब पाण्यासाठी वाट पाहायला लावण्याचे पाप गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. काँग्रेसला देशाने ६० वर्षे राज्य करण्याची संधी दिली. या ६० वर्षांत जगातील अनेक देश पूर्णपणे बदलले मात्र काँग्रेसला शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवता आले नाही. २०१४मध्ये साधारण १०० सिंचन योजना अशा होत्या ज्या अनेक दशकांपासून तशाच होत्या. यातील २६ योजना महाराष्ट्रातील होत्या. विचार करा किती मोठा धोका काँग्रेसने महाष्ट्राला दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, २०१४मध्ये सरकार बनल्यानंतर मी पूर्ण शक्ती सिंचन योजनांवर लावली. काँग्रेसने लटकवलेल्या १०० योजनांपैकी ६३ योजना आम्ही पूर्ण केल्या. प्रत्येक शेतात, प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवणे हे माझ्या जीवनाचे मोठे मिशन आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, मोदी गावातील आपल्या बहिणींना सशक्त करण्यामध्ये गुंतले आहेत. गेल्या १० वर्षात आमच्या प्रयत्नांनी एक कोटी लखपती दीदी बनल्या आहेत. आता मोदींची ही गॅरंटी आहे की मी ३कोटी बहिणींना लखपती बनणार आहे. आधी दिल्लीतून शेतकऱ्यांच्या नावावर थोडे जरी पैसै निघत होते तेव्हा काँग्रेसचा पंजा ते लुटत होता मात्र दिल्लीत बसलेला तुमचा मुलगा आहे.
वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची टीका मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पुन्हा…
पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर घणाघात मुंबई : मुंबई चैत्यभूमीतून प्रेरणा घेते, हे आमचे सरकार आहे.…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध दशमी ११.२४ पर्यंत नंतर एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तरा…
मुंबई : न्यायालयाने घाटकोपर होर्डिंग प्रकरणी भावेश भिंडेला २६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.…
मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांचे आवाहन पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी…
हत्येमागील कारण ऐकून पोलीसही हादरले लखनऊ : भावाबहिणीचं नातं हे पवित्र मानलं जातं. आईबाबांनंतर काळजी…