नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय महिला क्रिकेटपटू करुणा जैनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. या भारतीय महिला यष्टीरक्षक खेळाडूने रविवारी वयाच्या ३६व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली. “मी अतिशय आनंदी आणि समाधानी भावनांसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करते आणि खेळासाठी काहीतरी योगदान देण्यासाठी उत्सुक आहे”, असे करुणाने निवृत्ती जाहीर करताना म्हटले आहे.
करुणाने बीसीसीआय, एअर इंडिया, कर्नाटक, पुद्दुचेरी यांचेही आभार मानले आहेत. “यापैकी प्रत्येकाने मला खेळ आणि जीवनाबद्दल काहीतरी वेगळे शिकवले आणि आज मी जे काही आहे, त्यांच्यामुळेच आहे”, असेही तिने म्हटले आहे.
बेंगळूरु येथे जन्मलेल्या करुणाने तिच्या कारकिर्दीत भारत, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. करुणाने नोव्हेंबर २००५ मध्ये दिल्लीत इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिने ५ कसोटी सामन्यांत १९५ धावा केल्या आहेत. कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना ऑगस्ट २०१४ मध्ये खेळला होता.
कधी जाहीर होणार निकाल? मुंबई : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच CBSE बोर्डाच्या दहावी आणि…
जाणून घ्या नेमकं कसं उजळलं कर्मचाऱ्यांचं नशीब सिंगापूर : साधारणत: कंपन्यांकडून सणासुदीला किंवा नवीन वर्षाच्या…
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या विजयासाठी जोरदार तयारी करत…
सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भगव्याचा अवमान केला चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात मुंबई :…
मुंबई : पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच आता निसर्गप्रेमींचे पावसाळी पिकनिकचे प्लॅन…
९७० ग्रॅम सोने आणि ५ किलो चांदीही केली जप्त बीड : बीड शहरातील एक कोटी…