मुंबई :दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका केल्यासंदर्भात संदर्भात जबाब नोंदवण्यासाठी अभिनेत्री कंगना राणावतने खार पोलीस ठाण्यात गुरुवारी हजेरी लावली. दीड तास तिचा जबाब नोंदवण्यात आला.
काही दिवसांपूर्वी कंगनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका करताना आंदोलनाचा संबंध एका फुटीरतावादी संघटनेशी असल्याचे सांगितले. त्यानंतर शीख संघटनांनी मागील महिन्यात खार पोलीस ठाण्यात कंगना विरोधात तक्रार दाखल केली होती.
दिल्लीच्या सीमेवर झालेले शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन आहे, असं कंगनाने तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनात पंजाबमधील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता. कंगनाच्या या टिप्पणीनंतर शीख संघटनांकडून कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. कंगनाच्या या टिप्पणीनंतर शीख संघटनांकडून कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
शीख संघटनेने केलेल्या तक्रारीवर खार पोलिसांनी कंगनाविरोधात एफआयआर दाखल केला होता. या एफआयआरविरोधात कंगनाने या हायकोर्टात धाव घेतली होती. पोलिसांनी कंगनाविरोधात २५ जानेवारी २०२२ पर्यंत कोणतीही कारवाई करणार नसल्याचे म्हटले होते.
महायुतीच्या कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह सिंधुदुर्ग : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात…
मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. यामध्ये १२ राज्ये आणि…
मुंबई: कडिपत्त्याचे सेवन खाण्यापासून ते अनेक औषधांमध्ये केला जातो. यातील अनेक औषधीय गुण अनेक आजारांमध्ये…
पंतप्रधान नरेंद्र मोदींने ओढले काँग्रेसच्या पाकिस्तानधार्जिण्या भूमिकेवर आसूड नगर : मुंबईवर झालेल्या २६/११ सागरी हल्ला…
मुंबई : पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? असा सवाल आता…
मुंबई: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकाला लवकर यशस्वी व्हायचे असते आणि या शर्यतीत अनेकदा आपण आपली…