जैश-ए-मोहम्मदच्या लोकल हँडलरचा शोध सुरू

Share

नागपूर : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने नागपुरात येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची रेकी केल्याची माहिती पुढे आलीय. काश्मिरातून नागपूरला येऊन रेकी करणाऱ्या या दहशतवाद्याचा स्थानिक सहकारी (लोकल हँडलर) कोण याचा पोलिस शोध घेत आहेत.

जम्मू काश्मिरात काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला पोलिसांनी हँन्ड ग्रेनेडसह अटक केली. चौकशीदरम्यान या दहशतवाद्याने जुलै 2021 मध्ये नागपुरातील रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परीसराची रेकी केल्याची माहिती सुरक्षा संस्थांना दिली. हा दहशतवादी जुलै 2021 मध्ये विमानाने नागपूरला आला होता. नागपुरात आल्यानंतर तो सीताबर्डी परिसरातील एका लॉजमध्ये वास्तव्याला होता. नागपुरात दोन दिवस त्याचा मुक्काम होता. ही माहिती पुढे आल्यानंतर याबाबत नागपूर पोलिसांना कळवण्यात आले. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी ‘अनलॉफुल एक्टिव्हीटी प्रिव्हेन्शन एक्ट’ (यूएपीए) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तसेच पोलिसांचे एक पथक या दहशतवाद्याच्या चौकशीसाठी श्रीनगरला रवाना झाले. दरम्यान जैश ए मोहम्मदचा स्लीपर सेल म्हणून काम करणारा तो तरुण नागपुरात असताना त्याला स्थानिक पातळीवर कोणी मदत केली होती का याचा शोध ही आता नागपूर पोलीस घेत आहेत.

अतिशय गंभीर प्रकरण- फडणवीस

जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने नागपुरात येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची रेकी केल्या प्रकरणी प्रतिक्रिया देताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संघाच्या इमारतींची जैश-ए-मोहम्मद कडून रेकी होणे अतिशय गंभीर बाब आहे. याची माहिती आता पोलिसांना आणि केंद्रीय यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे यासंदर्भात योग्य खबरदारी महाराष्ट्राचे पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा घेतील. हे प्रकरण गांभीर्याने हाताळण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी सांगितले

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक ४ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग ऐद्र. भारतीय…

4 hours ago

पाकिस्तानला काँग्रेसचा पुळका

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांचा…

7 hours ago

नियोजनबद्ध कचरा व्यवस्थापन

मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक कचरा किंवा कचरा व्यवस्थापन ही देशातील मोठी समस्या आहे. दिल्ली, मुंबईसारख्या…

7 hours ago

मतदान जनजागृती काळाची गरज

रवींद्र तांबे दिनांक २० एप्रिल, १९३८ रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार…

8 hours ago

MI vs KKR: १२ वर्षांनी वानखेडेवर कोलकाताचा विजय

मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता.…

9 hours ago

Narendra Modi : बंगालचे नाव तृणमुलमुळे खराब झाले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना…

10 hours ago