मुंबई : मागील काही महिन्यांपासून आयपीएलची (IPL 2024) क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड चर्चा आहे. मुंबई इन्डियन्सच्या कॅप्टनवरुन तर विश्वचषकानंतर आयपीएल कायमच चर्चेत राहिली. आयपीएलची ही वाढती क्रेझ पाहून त्याच्या टायटल स्पॉन्सरशिपच्या किमती वाढल्या. गेली दोन वर्षे टाटा समूह (Tata Group) टायटल स्पॉन्सर (Title Sponsor) होता. यंदा या स्पर्धेत टाटासह आदित्य बिर्ला समूह (Aditya Birla Group) होता. पण अखेरीस टाटा समूहानेच बाजी मारली आहे. पुढील पाच वर्षे टाटा समूहच टायटल प्रायोजक राहणार आहे आणि त्यासाठी त्यांनी दरवर्षी ५०० कोटी रुपये म्हणजेच एकूण २५०० कोटी रुपयांची बोली लावली आहे.
टाटा सन्सने २०२८ पर्यंत आयपीएल टायटल स्पॉन्सरशिप मिळवली आहे. टाटा सन्सने आयपीएल २०२४ ते २०२८ च्या टायटल प्रायोजकत्वासाठी (IPL Title Sponsor) दरवर्षी ५०० कोटी रुपयांची बोली लावली आहे. या आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपच्या स्पर्धेत टाटासह आदित्य बिर्ला समूह होता. टाटाने लावलेली बोली आदित्य बिर्ला समूहाच्या बोलीशी जुळत होती असंही समोर आलं आहे. मात्र, अखेरीस टाटा सन्स भविष्यात या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचा टायटल स्पॉन्सर म्हणून कायम राहणार आहे.
गेल्या वर्षी १२ डिसेंबर रोजी बीसीसीआयने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग प्रायोजकत्वासाठी निविदा (Tendor) जारी केली होती. १४ जानेवारी रोजी आदित्य बिर्ला समूहाने यासाठी २५०० कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यानंतर टाटा समूहाने हीच बोली लावण्याचा निर्णय घेतल्याची बातमी शुक्रवारी संध्याकाळी आली. टाटा समूह गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलचा प्रायोजक आहे. गेल्या दोन वर्षात म्हणजेच आयपीएल २०२२ आणि २०२३ मध्ये प्रायोजकत्वासाठी टाटा समुहाने बीसीसीआयला ६७० कोटी रुपये दिले. आता आयपीएलसाठी टायटल स्पॉन्सरशिपची रक्कम वाढली आहे.
आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपच्या किमती वाढण्यामागचं मुख्य कारण म्हणजे आयपीएलची वाढती क्रेझ आहे, याशिवाय येत्या सीझनमध्ये आयपीएल मॅचेसची संख्याही वाढवण्यात येणार आहे.आयपीएल २०२४ मध्ये एकूण ७४ सामने होणार आहेत. यानंतर, बीसीसीआयने आयपीएल २०२५ मध्ये ते ८४ सामने आणि नंतर आयपीएल २०२६ पासून ९४ सामने वाढवण्याची बीसीसीआयची योजना आखली आहे.
बहुप्रतिक्षित आयपीएलचा आगामी हंगाम २१ मार्च महिन्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे. त्याधी वूमन्स आयपीएल होईरल. लोकसभा निवडणुकीनंतर आयपीएल २०२४ भारतातच खेळवली जाण्याची शक्यता आहे.
जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश! मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकल…
पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्याने खळबळ मुंबई : बसमधून प्रवास करत असताना दोन लोक दादर…
नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तरुणाईमध्ये मोठी चढाओढ सुरु असते. विद्यार्थी रात्रंदिवस…
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असला तरी आपण तिस-यांदा सत्तेत…
योगी आदित्यनाथ यांचा ठाम विश्वास पालघर : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून…
जम्मू : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वातावरण आहे. परंतु, काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरु…