भारताच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला झटका, टीम इंडिया तीनही फॉरमॅटमध्ये अव्वल

Share

दुबई: भारताने(india) इंग्लंडला ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यावर सलग चार सामने जिंकत मालिका ४-१ अशी खिशात घातली. टीम इंडियाचा हा मालिका विजय आयसीसीच्या रँकिंगमध्येही त्यांना फायदेशीर ठरला आहे. भारताने धरमशालामध्ये इंग्लंडला चांगलीच मात देत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी रँकिंगमध्ये पहिले स्थान मिळवले आहे.

भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. या पद्धतीने भारतीय संघ खेळाच्या तीनही फॉरमॅटमध्ये आयसीसीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तालिकेत पहिल्या स्थानावर आहे.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ख्राईस्टचर्च येथे सुरू असलेल्या सामन्याचा निकाल काहीही असला तरी रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ अव्वल स्थानावर कायम राहणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सध्याचा विजेचा ऑस्ट्रेलियाने वेलिंग्टनमध्ये पहिला कसोटी सामना १७२ धावांनी जिंकला होता आणि आता ते या मालिकेत १-० असे आघाडीवर आहेत.

भारताचे कसोटी रँकिंगमध्ये आता १२२ रेटिंग झाले आहेत जे ऑस्ट्रलियापेक्षा पाच अंकांनी अधिक आहे. इंग्लंडचा संघ १११ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहेत. वनडेत भारताचे १२१ रेटिंग आहे तर ऑस्ट्रेलिया ११८ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीमध्ये भारताचे २६६ अंक आहेत. इंग्लंडचे या प्रकारात २५६ गुण असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

12 mins ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

1 hour ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

2 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

2 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

2 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

2 hours ago