Ind vs Ire: भारत वि आयर्लंड तिसरा सामना रद्द, भारताने मालिका २-०ने जिंकली

Share

डबलिन: भारत (india) आणि आयर्लंड (ireland) यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारत आणि आयर्लंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा सामना आज रंगणार होता. मात्र सुरूवातीपासूनच पावसाने खोडा घातला.

पावसामुळे टॉस उशिराने होणार असे सांगण्यात आले मात्र पाऊस काही थांबण्यास तयार नव्हता. अखेर दीर्घकाळ वाट पाहिल्यानंतर हा सामना रद्द करण्यात आला आहे. भारताने या मालिकेतील दोन सामने आधीच खिशात घातले आहेत. त्यामुळे भारताने तीन सामन्यांची ही मालिका २-० अशी जिंकली आहे.

जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयर्लंडमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. पहिल्या दोन सामन्यात भारताच्या संघाने जबरदस्त कामगिरी करत मालिकेत विजय मिळवले होते.

आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला होता. तो सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार दोन धावांनी जिंकला होता. त्यानंतरच्या दुसऱ्या सामन्यात भारताने एकहाती विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात भारताने १८६ धावांचे आव्हान आयर्लंडसमोर दिले होते मात्र आयर्लंडने झुंज देत १५२ धावा केल्या.

Recent Posts

IPL 2024: प्लेऑफचे सामने कुठे आणि कधी रंगणार? कोणत्या संघामध्ये होणार सामना घ्या जाणून

मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द होण्यासोबतच आयपीएलच्या लीग सामन्यांची सांगता…

5 mins ago

Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, अनेक दिग्गज मैदानात

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या पाचव्या टप्प्यात आठ राज्यातील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी…

1 hour ago

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

15 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

15 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

16 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

16 hours ago