मुंबई: भारताच्या यजमानपदाखाली खेळवला जात असलेला आयसीसी विश्वचषक २०२३ आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीतील संघ ठरले आहेत. हे संघ आहेत भारत आणि ऑस्ट्रेलिया. हे दोन्ही संघ २० वर्षांनी पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये आमनेसामने असतील.
याआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २००३ वर्ल्डकपचा फायनल सामना खेळवण्यात आला होता.हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये खेळवण्यात आला होता. यात भारतीय संघाला १२५ धावांनी पराभव सहन करावा लागला होता. तेव्हा भारतीय संघाचे नेतृत्व सौरव गांगुलीच्या हातात होते. कांगारूंचे नेतृत्व रिकी पॉटिंग करत होता.
२० वर्षानंतर दोन्ही संघ बदलले आहेत. आता भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या हातात आहे तर कांगारूंचे नेतृत्व वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स सांभाळत आहेत. यावेळेस हा खिताबी सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल.
२००३मध्ये गांगुलाच्या नेतृत्वात दादागिरी झाली होती. मात्र आता २० वर्षांनी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ खूप बदलले आहेत. यावेळेस भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ तगडी दिसत आहे. यावेळेस वर्ल्डकपमध्ये नव्या भारताची दादागिरी पाहायला मिळेल.
भारतीय संघाने आतापर्यंत आपले १०ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने १० पैकी ८ सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडला ७० धावांनी हरवत फायनल गाठली आहे. तर कांगारूच्या संघाने चोकर्स म्हटल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला ३ विकेटनी हरवत फायनलमध्ये प्रवेश केला.
आता ऑस्ट्रेलियाचा संघ ८व्यांदा फायनलमध्ये खेळण्यास उतरणार आहे. त्यांनी आतापर्यंत ७ पैकी पाचवेळा खिताब जिंकला आहे. त्यांना दोन वेळा वेस्ट इंडिज आणि १९९६मध्ये श्रीलंकेविरुद्ध पराभव सहन करावा लागला होता. तर ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक ५ वेळा १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५मध्ये खिताब जिंकला होता.
तर भारतीय संघाचा विश्वचषकातील चौथा खिताबी सामना आहे. या संघाने १९८३मध्ये कपिल देवच्या नेतृत्वात पहिल्यांदा खिताब जिंकला होता. यानंर २००३मध्ये भारताला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव सहन करावा लागला होता. मात्र २०११मध्ये भारतीय संघाने दुसऱ्यांदा वर्ल्डकप पटकावला. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळला होता.
महाराष्ट्र अजूनही मतदानात मागेच... मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर…
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (HSC and SSC Board) घेतल्या जाणार्या…
'या' शुभ दिवशी झाला बाळाचा जन्म मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam)…
जाणून घ्या देशात किती टक्के मतदान? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksbaha Election) पाचव्या टप्प्यात देशातील…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) राज्यात आज पाचव्या…
मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची…