मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील मॅचमध्ये कोण जिंकणार, हा प्रश्न कुठल्याही सच्चा क्रिकेटप्रेमीला सतावत नाही. टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या पहिल्या ‘संडे स्पेशल’ लढतीत विराट कोहलीचा संघ जिंकेल, असा ठाम विश्वास देशातील १३५ कोटी जनतेला आहे.
भारत आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमधील लढत म्हणजे जगभरातील चाहत्यांसाठी मोठी पर्वणी. या दोन तुल्यबळ संघांना पाच वर्षांनंतर एकमेकांशी झुंजताना पाहण्याची संधी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) सुरू झालेल्या आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेने उपलब्ध करून दिली आहे. कोरोना साथीनंतरच्या ‘अनलॉक’ प्रत्येक घडामोडीची प्रत्येकाला उत्सुकता आहे.
जागतिक क्रीडा स्पर्धा पाहता टोक्यो ऑलिम्पिकनंतर यूएईतील टी-ट्वेन्टी वर्ल्डकपने क्रीडाप्रेमींच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. वर्षभराने पुढे ढकलले गेले तरी टोक्योमध्ये भारताने वैयक्तिक सुवर्णपदकाला गवसणी घातली. भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी केली. तीच संधी यूएईत पाच वर्षांनी होत असलेल्या वर्ल्डकपच्या माध्यमातून विराट कोहली आणि सहकाऱ्यांना चालून आली आहे.
भारताच्या नावावर दोन वनडे वर्ल्डकप(१९८३ आणि २०११) आणि एक टी-ट्वेन्टी वर्ल्डकप (२००७) आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्यावहिल्या टी-ट्वेन्टी विश्वचषकावर भारताने नाव कोरले तरी त्यानंतर २०१४ वगळता जेतेपदाच्या जवळ पोहोचता आलेले नाही. वास्तविक पाहता यूएईत सुरू असलेला वर्ल्डकप भारतात होणार होता. मात्र, कोरोनामुळे बीसीसीआयला त्यांच्या यजमानपदाखालील परदेशात विश्वचषक आयोजित करावा लागत आहे. त्यामुळे, भारताच्या दृष्टीने टी-ट्वेन्टी वर्ल्डकपला मोठे महत्त्व आहे. कुठल्याही स्पर्धेत पहिली मॅच खूप महत्त्वाची असते. त्यातच पाकिस्तानसारख्या प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करायचे म्हटल्यानंतर क्रिकेटपटूंसह चाहत्यांमध्ये वाढता जोश आहे. कोरोना निर्बंध काही प्रमाणात कायम असल्याने चाहते उघडपणे त्यांचा आनंद व्यक्त करू शकत नाही. मात्र, भारताला पाकिस्तानशी दोन हात करताना कधी एकदा पाहतो, असे क्रिकेटशौकिनांना झाले आहे.
भारताचे क्रिकेटपटू वर्ल्डकपूर्वी, आयपीएलमध्ये खेळलेत आणि ही टी-ट्वेन्टी लीगही यूएईत झाली आहे. त्यात कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा तसेच रिषभ पंत, ईशान किशन, सूर्यकुमार यादव यांनी चमकदार कामगिरी केली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव लढतीत ‘आयपीएल इफेक्ट’ दिसला. प्रत्यक्ष स्पर्धेतही त्याची पुनरावृत्ती होईल, हे नक्की.
प्रतिस्पर्धी संघ कितीही तुल्यबळ असला तरी इतिहास आपल्या बाजूने आहे. सध्याचा फॉर्म पाहता भारताला विजयाची सर्वाधिक संधी आहे. ‘जिंकून जिंकून जिंकणार कोण, भारताशिवाय आहेच कोण’ याच घोषणांनी रविवारची रात्र दणाणून निघणार, हे लक्षात ठेवा. सीमेवर असो किंवा क्रिकेटच्या मैदानात, भारतच जिंकणार, असा विश्वास सर्वांना आहे. देशवासियांचा विश्वास आपले क्रिकेटपटू नक्कीच सार्थ ठरवतील.
मुंबई: आयपीएल २०२४मध्ये(ipl 2024) गुरूवारी ५०वा सामना खेळवण्यात आला. हा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स…
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा अखेर करण्याती आली…
मुंबई: आजकाल प्रत्येक कामे ही मोबाईलनेच केली जातात. विचार करा की जर तुमच्याकडे फोन नसेल…
मुंबई: स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात काही गोष्टी दिसणे शुभ मानले जाते. यामुळे व्यक्ती नेहमी आनंदी जीवन जगतो.…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण दशमी शके १९४६.चंद्र नक्षत्र शततारका. योग ब्रम्हा. चंद्र राशी कुंभ…
देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून येत्या ७ मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या…