भारत ६जी लाँच करण्याच्या तयारीत

Share

नवी दिल्ली : देशात ५जी सेवा ऑक्टोबरपर्यंत सुरू होणार असल्याची घोषणा काल केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेली असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यापुढे जाऊन सरकार या दशकाच्या अखेरीस ६जी लाँच करण्याची तयारी करत असल्याचे सांगितले. स्मार्ट इंडिया हॅकाथॉनच्या ग्रँड फिनालेमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली.

पीएम मोदी पुढे म्हणाले, ‘शेती आणि आरोग्य क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी तरुण नवीन उपायांवर काम करू शकतात. आम्ही या दशकाच्या अखेरीस ६जी लाँच करण्याची तयारी करत आहोत. सरकार गेमिंग आणि मनोरंजनामध्ये भारतीय उपायांना प्रोत्साहन देत आहे. सरकार ज्या पद्धतीनं गुंतवणूक करत आहे, त्याचा सर्व तरुणांनी लाभ घ्यावा.’

रोज नवनवीन क्षेत्रं आणि आव्हानं नाविन्यपूर्ण उपायांद्वारे शोधली जात आहेत. मोदींनी नवसंशोधकांना शेतीशी संबंधित समस्यांवर उपाय शोधण्यास सांगितले आहे. तरुण नवोदितांना प्रत्येक गावात ऑप्टिकल फायबर आणि ५जी लाँच, गेमिंग इकोसिस्टमला चालना देण्यासारख्या उपक्रमांचा पूर्ण लाभ घेण्यासही सांगितले आहे. भारत या वर्षी ऑक्टोबरपर्यंत ५जी तंत्रज्ञानाचा रोलआउट पाहण्यास तयार आहे, असेही मोदी म्हणाले.

देशात ऑक्टोबरपर्यंत ५जी सेवा सुरू होणार

याआधी एका पत्रकार परिषदेत केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, या वर्षी ऑक्टोबरपर्यंत देशात ५जी सेवा सुरू होईल, अशी शक्यता आहे. उद्योगाने ५जी पायाभूत सुविधांसाठी काम सुरू केले आहे आणि २-३ वर्षांत ते देशाच्या प्रत्येक भागात पोहोचेल. आम्ही उद्योगांना ५जी शुल्क परवडणारे आणि प्रवेश योग्य ठेवण्याची विनंती केली आहे. आमचे मोबाईल सेवा शुल्क जगातील सर्वात कमी आहे. भारतीयांना जागतिक दर्जाची ५जी सेवेची सुविधा मिळणार आहे. ५जी जलद गतीने सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पायऱ्या अतिशय चांगल्या आणि पद्धतशीरपणे सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक ४ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग ऐद्र. भारतीय…

5 hours ago

पाकिस्तानला काँग्रेसचा पुळका

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांचा…

8 hours ago

नियोजनबद्ध कचरा व्यवस्थापन

मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक कचरा किंवा कचरा व्यवस्थापन ही देशातील मोठी समस्या आहे. दिल्ली, मुंबईसारख्या…

8 hours ago

मतदान जनजागृती काळाची गरज

रवींद्र तांबे दिनांक २० एप्रिल, १९३८ रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार…

9 hours ago

MI vs KKR: १२ वर्षांनी वानखेडेवर कोलकाताचा विजय

मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता.…

10 hours ago

Narendra Modi : बंगालचे नाव तृणमुलमुळे खराब झाले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना…

11 hours ago