IND vs Eng: धरमशाला कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज चमकले

Share

धरमशाला: भारत आणि इंग्लंड यांच्यात धरमशाला येथे पाचवा कसोटी सामना खेळवला जात आहे. सामन्यात दोन दिवसांचा खेळ पूर्ण झाला आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात ८ बाद ४७३ धावा केल्या होत्या. जसप्रीत बुमराह १९ तर कुलदीप यादव २७ धावांवर नाबाद आहेत. पहिल्या डावाच्या आधारावर भारताने २५५ धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडचा पहिला संघ २१८ धावांवर आटोपला.

रोहित शर्मा आणि शुभमन गिलचे शतक

पहिल्या दिवशीचा भारताने एक विकेट गमावला होता. यशस्वी जायसवालने ५७ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधील आपले १२वे शतक ठोकले. रोहितने १५४ बॉलमध्ये शतक ठोकले. रोहितनंतर शुभमन गिलनेही १३७ बॉलमध्ये शतक ठोकले. त्याचे हे चौथे शतक होते. दरम्यान, लंचनंतर टीम इंडियाला सलग २ झटके बसले. आधी बेन स्टोक्सने भारताचा कर्णधार रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले. तर शुभमन गिलही जेम्स अँडरसनच्या बॉलवर क्लीन बोल्ड झाला.

त्यानंतर सर्फराज खान आणि देवदत्त पड्डिकल यांनी डाव सांभाळला. या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी झाली. पड्डिकलने ६५ आणि सर्फराज खानने ५६ धावा केल्या. यानंतर भारताने नियमित अंतराने विकेट गमावल्या.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

9 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

10 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

11 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

11 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

11 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

11 hours ago