मुंबई: मंगळवारी २७ फेब्रुवारीला भोजपुरी सिनेसृष्टीतून एक दुख:द बातमी समोर आली होती. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की पंचायत फेम अभिनेत्री आंचल तिवारी हिचे निधन झाले आहे. ती त्या ९ लोकांमध्ये सामील होती ज्यांचा २५ फेब्रुवारीला बिहारच्या मोहानिया येथे देवकली गावाजवळ एका रस्ते अपघातात मृत्यू झाला. मात्र आता अभिनेत्रीने तिच्या मृत्यूची बातमी अफवा असल्याचे म्हटले आहे. तसेच तिने म्हटले की ती जिवंत आहे.
आंचल तिवारीने पंचायतच्या सीझन २मध्ये प्रधानजींच्या मुलीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती चर्चेत आली होती. आता तिच्या मृत्यूच्या बातमीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र आंचलने स्वत:समोर येत तिच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे.
ती एकदम व्यवस्थित आहे. असे काहीही झालेले नाही. दरम्यान, ज्या आंचल तिवारीचा मृ्त्यू झाला ती भोजपुरी अभिनेत्री होती असे तिने स्पष्ट केले आहे.
आंचलने सोशल मीडियाच्या माध्यमातून निधनाची बातमी खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. तिने आपल्या मृ्त्यूची चुकीची बातमी फैलावल्याबद्दल निराशाही व्यक्त केली. सोबतच इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याबाबतची मोठी पोस्ट लिहिली आहे. व्हिडिओ शेअर करत तिने मी जिवंत आहे. एकदम व्यवस्थित आहे असे म्हटले आहे.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…