विरार : वसई – विरारला १८५ एमएलडी पाणी देण्यासाठी एमएमआरडीएकडून तयार झालेल्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे दिवाळीच्या आत उद्घाटन करून जनतेला दिलासा द्यावा या मागणीसाठी रविवारी विरारमधील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरून नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. या दिवाळीपूर्वी या योजनेचे उद्घाटन करा नाही तर नाइलाजास्तव १५ नोव्हेंबरनंतर यासाठी आमरण उपोषण सुरू करावे लागेल, असे ‘पाणी हक्क आंदोलना’चे प्रमुख नेते मयुरेश वाघ यांनी यावेळी जाहीर केले. त्यामुळे या पाणी योजनेच्या उद्घाटनासाठी आता पाणी हक्क आंदोलन आणखी तीव्र होणार आहे.
विरार पश्चिमेच्या विविध भागांतील नागरिकांनी रविवारी संध्याकाळी मयुरेश वाघ यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांवर उतरून सूर्या पाणी योजनेचे रखडलेले उद्घाटन करण्याची मागणी केली. कोणीही श्रेय घ्यावे, पण जनतेला पाणी द्यावे व लवकरात लवकर सूर्या योजनेचे उद्घाटन करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली. विरारच्या बायपास रस्त्यावरून सुरू झालेल्या या मोर्चाचा समारोप पेट्रोल पंम्प येथे झाला. त्यात शेकडो महिला – पुरुष, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.
आम्ही सतत पाठपुरावा करून पाणी योजनेचे काम पूर्ण करून घेतले आहे, त्यानंतर पाणी योजनेच्या उद्घाटनासाठी सरकार दरबारी पण पाठपुरावा करीत आहोत आणि रस्त्यावर संघर्ष करून जनतेच्या तीव्र भावनाही सरकार व प्रशासनापर्यंत पोहोचवित आहोत. पाण्यासाठी लोक तहानलेले आहेत. दिवाळीपूर्वी पाणी योजनेचे लोकार्पण करून सूर्याचे पाणी लोकांना सुरू करा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन उभारू आणि आपण १५ नोव्हेंबरनंतर आमरण उपोषण करणार, असे वाघ यांनी जाहीर केले. यास हजारो लोकांनी समर्थन दिले असून, आम्हीही आमरण उपोषणाला बसणार असे महिला – पुरुष कार्यकर्त्यांनी या मोर्चात सांगितले.
नुकतेच खा. गावित, वाघ यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाणी योजनेचे उद्घाटन करण्याबाबत निवेदन दिले आहे.
RCB vs DC: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकत बंगळुरुला फलंदाजीला…
पाटणा: बिहारची राजधानी पाटणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो झाला. आधी पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळी…
मुंबई: स्वस्त 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर Samsung Galaxy F14 5G हा…
मुंबई: हल्ली लोक बाटलीतील पाणी पिण्याला पसंती देतात. उभ्या उभ्या बाटलीतील पाणी संपवता येते. मात्र…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या १७व्या हंगामातील ६१व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सला पाच विकेटनी…
सासूने पकडले पाय तर पतीने दाबला गळा नवी दिल्ली : आज जगभरात आईविषयी कृतता व्यक्त…