रत्नागिरी : चिपळूण शहरातील खाटीक गल्ली येथील एका बंद घराला काल (दि. २९ डिसेंबर) भीषण आग लागली. घरी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीत घरातील विविध वस्तू व साहित्य जळून खाक झाले. त्यात लाखोंचे नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणली. आग कशामुळे लागली त्याचे कारण समजू शकलेले नाही.
शहरातील खाटीक गल्ली येथील आरशद मेहता सहीबोले हे आपल्या कुटुंबासह परदेशी असतात. त्यांचा फरदीन हा मुलगा त्यांच्या धामणदेवी येथील बहिणीकडे राहतो. त्यामुळे त्यांचे शहरातील घर बंदच असते. त्याच्या घराला आग लागली.
जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश! मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकल…
पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्याने खळबळ मुंबई : बसमधून प्रवास करत असताना दोन लोक दादर…
नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तरुणाईमध्ये मोठी चढाओढ सुरु असते. विद्यार्थी रात्रंदिवस…
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असला तरी आपण तिस-यांदा सत्तेत…
योगी आदित्यनाथ यांचा ठाम विश्वास पालघर : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून…
जम्मू : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वातावरण आहे. परंतु, काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरु…