वाडा (वार्ताहर) : पूर्वीच्या काळात घरोघरी मातीच्या चुली वापरल्या जात. आधुनिक काळात घरोघरी गॅस शेगड्यांचा वापर सुरू झाल्याने मातींच्या चुलींची मागणी कमी झाली व त्यामुळे मातीच्या वस्तू बनवणाऱ्या या व्यवसायाला घराघर लागली. परंतु, आधुनिक काळातही लोकांना मातीच्या वस्तूंचे महत्त्व कळू लागल्याने याच वस्तूंकडे लोक आकर्षित होताना दिसत आहेत. त्यामुळे या व्यवसायाला पुन्हा संजीवनी मिळेल अशी आशा उत्पादकांना वाटत आहे.
शेकडो वर्षांपासून मातीचे माठ, चुली, चुलुंबे, पणत्या, सुगडे, लग्नविधीसाठीचे न्हाणे, बांडी, मडके इत्यादी वस्तू मानवी जीवनाचा अविभाज्य भाग होता. परंतु, आधुनिक काळात या वस्तू हद्दपार होताना दिसत होत्या. मात्र, आधुनिकतेबरोबर लोखंडी, प्लास्टिक इत्यादींपासून बनवलेल्या वस्तूंमुळे माणसाचे आरोग्य धोक्यात येऊ लागल्याचे दिसू लागताच पुन्हा मातीच्याच वस्तूंकडे माणसाचा कल वाढू लागल्याचे मातीवस्तू निर्मिती व्यवसायिकांचे म्हणणे आहे.
मातीच्या वस्तूचे महत्त्व नागरिकांना पटत चालल्याने तसेच चुलीवरच्या जेवणाची लज्जतही लोकांना भुरळ घालत असल्याने आज चुलींनाही मागणी वाढत आहे. कुणबी तसेच आगरी समाजात लग्नसमारंभातही चुलीची आवश्यकता भासत असते. आज मातीच्या चुली २५० ते ३०० रुपये तर चुलुंबा १०० ते १५० रुपये या दराने विक्री होत असते.
वडिलोपार्जित या व्यवसायावरच आमच्या कुटुंबीयांचा उदर्निवाह होत असून हा व्यवसाय काही काळ लोप पावत चालला होता. मात्र, आता पुन्हा या व्यवसायाला संजीवनी मिळेल अशी आशा आहे. – वर्षा चिरनेरकर, माती वस्तू व्यवसायिक, कुंभार आळी, वाडा
मुंबईत जे घडतं, त्याची चर्चा देशभर होते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यांतून लोक…
फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे काही लोकांना सतत खोटं बोलण्याची सवय असते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकदा सातत्याने…
इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झालेत. मुंबईसह महाराष्ट्रात सर्व…
मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सची अय्यर जोडीने कमाल केली. कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला हरवत दिमाखात आयपीएलच्या…
मुंबई: झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे रील बनवण्याच्या नादात तरुणाने १००…
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे नसल्याचे…