नाशिक : विनाहेल्मेट (Helmet) प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण शहरात वाढले आहे. अपघाती मृत्यू रोखता यावेत यासाठी प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान करूनच प्रवास करावा, असे आवाहन पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी केले आहे. हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात एक डिसेंबरपासून मोहीम तीव्र करण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला आहे.
हेल्मेट (Helmet) न घातल्याने चालू वर्षात शहरात ८३ दुचाकीस्वारांनी जीव गमावला आहे. याशिवाय अन्य अपघातांमध्ये २६१ दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. अपघातात रस्त्यावर पडून डोक्याला मार लागल्यामुळे गंभीर जखमी होतात. रस्त्यावर डोके आपटून डोके फुटल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू होत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे. शहरात प्रायोगिक तत्त्वावर पोलिसांनी मुंबई- आग्रा महामार्गावर गस्त वाढवली. त्यामुळे प्राणांतिक अपघातांमध्ये बऱ्यापैकी घट झाली. हेल्मेट वापरणे हे वैयक्तिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने अपघात झालाच तरी हेल्मेट वापरल्यामुळे जीवितहानीसह डोक्याला व चेहऱ्याला होणारी गंभीर दुखापत टाळता येते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर जाणीवपूर्वक करावा, असे आवाहन पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी केले आहे.
हेल्मेट परिधान न करता दुचाकी चालविणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायदा अधिनियम १९८८ चे कलम १२९/१७७ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येते. त्यामध्ये ५०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात येतो. एक डिसेंबरपासून हेल्मेट परिधान न करताच वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी स्पष्ट केले आहे.
यापूर्वीही हेल्मेट वापराबाबत शहरात वेळोवेळी मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. ज्या ज्या वेळी अशा मोहिमा राबविण्यात आल्या, त्या वेळी अपघातांच्या संख्येत आणि प्राणांतिक अपघातांमध्ये व गंभीर दुखापतींमध्येही घट झाल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनीही शहरात हेल्मेटसक्तीची मोहीम राबविली. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन्ही व्यक्तींना हेल्मेटसक्ती करण्यात आल्याने या मोहिमेला सुरुवातीला विरोधही झाला. मात्र, या मोहिमेमुळे दुचाकीस्वार हेल्मेट परिधान करूनच घराबाहेर पडत असल्याचेही पाहायला मिळाले. आता नाईकनवरे यांनीही हेल्मेटचा वापराचा आग्रह धरला आहे. मात्र, हेल्मेटसक्ती केवळ चालकाला असणार की मागे बसणाऱ्याला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग ऐद्र. भारतीय…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांचा…
मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक कचरा किंवा कचरा व्यवस्थापन ही देशातील मोठी समस्या आहे. दिल्ली, मुंबईसारख्या…
रवींद्र तांबे दिनांक २० एप्रिल, १९३८ रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार…
मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता.…
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना…