मुंबईसह कोकणात दमदार पाऊस

Share

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई परिसरात रविवारी पहाटेपासून पावसाला दमदार सुरुवात झाली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंंबईकरांना दिलासा मिळाला. दरम्यान मुंबई शहर, उपनगरांत तसेच कोकणातही रविवारी पावसाने हजेरी लावल्याने लांबणीवर पडलेल्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेने काहीसा नि:श्वास सोडला.

दरम्यान, येत्या ४ दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या ३ दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाण्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रविवारी मुंबईबरोबरच औरंगाबाद, वैजापूर, पालघर, कर्जत, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी परिसरात पाऊस पडला. यावर्षी राज्यात लवकर पाऊस येण्याचे हवामान विभागाचे संकेत असताना पावसाने जवळपास हुलकावणी दिली. यामुळे उकाडा तसेच पावसामुळे लांबणीवर पडलेली पेरणी तसेच पाण्याचा जाणवणारा तुटवडा पाहता रविवारी पडलेला पाऊस पाहता राज्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील रविवारी अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. वैजापूर तालुक्यातील पोखरी गावात पावसाने हजेरी लावली आहे.

तळकोकणात रिमझिम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू झाला. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, दोडामार्ग तालुक्यात रिमझिम पाऊस पडला. दोन ते तीन तास रिमझिम पावसाने हजेरी लावली.

रत्नागिरीत जोरदार पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. सध्याचा हा पाऊस शेतीसाठी पूरक असणार आहे. भात लावणीला सुरुवात होणार असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

दरड कोसळून २ जण जखमी

चेंबूरच्या आरसीएफ न्यू भारतनगर डोंगराळ झोपडपट्टीमध्ये रविवारी दरड कोसळल्याची घटना घडली. मोठा दगड एका झोपडीवर कोसळला. या घटनेत अरविंद प्रजापती आणि आशीष प्रजापती हे जखमी झाले आहेत.

वीज पडून चिमुकल्याचा मृत्यू

पालघर जिल्ह्यातील मनोर जवळील येंबूर (टोकेपाडा) गावात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अंगणात खेळत असताना वीज पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यश सचिन घाटाल असे मृत मुलाचे नाव आहे.

शेतकरी वर्गात समाधान

अलिबागमध्ये जिल्ह्याच्या सर्वच भागांत मान्सून चांगलाच सक्रिय झाला असून पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदित आहेत. खरीप हंगामासाठी पुरेसे बियाणे आणि खतसाठा उपलब्ध असून त्याची टंचाई जाणवणार नाही. जिल्ह्यात १७ जूनअखेर सरासरीच्या ८ टक्के पाऊस झाला आहे. भात, नाचणी, वरी या प्रमुख तीन पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. सध्या शेतकरी नांगरणीच्या कामात व्यस्त आहेत.

Recent Posts

IPL 2024 Playoffs: हंगामातील ५० सामने पूर्ण, ५ संघांचे नशीब इतरांच्या हाती

मुंबई: आयपीएल २०२४मध्ये(ipl 2024) गुरूवारी ५०वा सामना खेळवण्यात आला. हा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स…

39 mins ago

Loksabha Election 2024: रायबरेली येथून राहुल गांधी, अमेठीमधून केएल शर्मा उमेदवार, काँग्रेसची घोषणा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा अखेर करण्याती आली…

2 hours ago

घाबरू नका! फोन चोरी झाल्यास Paytm आणि Google Pay असे करा डिलीट

मुंबई: आजकाल प्रत्येक कामे ही मोबाईलनेच केली जातात. विचार करा की जर तुमच्याकडे फोन नसेल…

2 hours ago

Dream: नशीब बदलतील स्वप्नात दिसलेल्या या ३ गोष्टी

मुंबई: स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात काही गोष्टी दिसणे शुभ मानले जाते. यामुळे व्यक्ती नेहमी आनंदी जीवन जगतो.…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक ३ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण दशमी शके १९४६.चंद्र नक्षत्र शततारका. योग ब्रम्हा. चंद्र राशी कुंभ…

5 hours ago

विकासकामांच्या पाठबळावर मोदींचे विरोधकांना प्रत्युत्तर

देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून येत्या ७ मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या…

8 hours ago