Health Insurance: आता कोणत्याही वयात मिळणार Health Insurance, आजारीही खरेदी करू शकणार पॉलिसी

Share

मुंबई: इंश्युरन्स सेक्टरचे रेग्युलेटर आयआरडीएआयने हेल्थ इन्शुरन्स(health insurance) पॉलिसीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता ६५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तीही हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकणार आहेत. यामुळे म्हातारपणादरम्यान लोकांना उपचारामध्ये मोठी मदत होईल. सध्याच्या घडीला जास्त वयाच्या लोकांना हेल्थ इन्शुरन्सचा लाभ मिळत नव्हता.

सर्वाधिक ६५ वयाचा नियम हटवला

आयरडीएआयने कमाल वयाची मर्यादा हटवून हेल्थकेअर सिस्टीम सर्वांपर्यंत पोहोचण्याचा रस्ता सुकर केला आहे. आता कोणीही अगदी सोप्य पद्धतीने हेल्थ इन्शुरन्स प्लान्स खरेदी करू शकणार आणि अचानक येणाऱ्या आजाराचा खर्च करू शकतात. जुन्या गाईडलाईन्समध्ये नवी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी केवळ ६५ वर्षापर्यंतच्या व्यक्तींनाच खरेदी करता येत होती. मात्र आयरडीएआयचे हे नवे नियम १ एप्रिलपासून लागू झाले आहेत.

आजारी व्यक्तीलाही मिळणार हेल्थ इन्शुरन्स

विमा कंपन्यांना अशी उत्पादने विकावी लागतील जी प्रत्येक वयाच्या लोकांसाठी लागू असतील. सोबतच कंपन्यांना वरिष्ठ नागरिक, विद्यार्थी, मुले आणि मातृत्वाला लक्षात घेता अशी उत्पादने आणावी लागतील. तसेच आधीपासून आजारांशी झुंजणाऱ्या व्यक्तींच्या हिशेबाने कंपन्यांना विमा पॉलिसी आणावी लागेल. आयरडीएआयने आधीच स्पश्च केले की कंपन्या कॅन्सर, हार्ट, तसेच एड्ससारख्या आजारांशी लढणाऱ्या लोकांना हेल्थ इन्शुरन्स देण्यापासून मनाई करू शकत नाही.

Recent Posts

SAIL Recruitment : आनंदाची बातमी! युवकांना मिळणार भारतातील ‘या’ मोठ्या कंपनीत काम करण्याची संधी

लवकरच करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : सध्या अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. अशाच…

2 hours ago

Nitesh Rane : भाजपाच्या जाहिरातीमुळे पाकिस्तानी काँग्रेसच्या नेत्यांना हिरव्या मिरच्या झोंबल्या!

संजय राऊत हा महाराष्ट्राचा बिलावल भुट्टो पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या काँग्रेसला आमदार नितेश राणे यांचा दणका…

2 hours ago

Devendra Fadnavis : पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या? कुठे जाणार होते? सत्य बाहेर आले तर बिंग फुटेल!

देवेंद्र फडणवीसांचा अमोल कोल्हेंना इशारा शिरुर : पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या? कुठे जाणार…

2 hours ago

बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतले असते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका काँग्रेसने २६/११ हल्ल्यातील शाहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना…

3 hours ago

Dombivali news : पती-पत्नीमधील वाद सोडवणार्‍यांनाच संपवलं; दोन वेगवेगळ्या हत्यांनी डोंबिवली हादरलं!

डोंबिवली : संसार म्हटला की वाद, मतभेद होतातच. पण हे वाद जर प्रचंड टोकाला गेले…

3 hours ago

Eknath Shinde : दिघेसाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचा पहिला प्रश्न होता, ‘दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे?’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राजकीय पक्षांच्या (Political…

4 hours ago