Mumbai Indians Captain : ठरलं! आता रोहित शर्मा नाही तर ‘हा’ असणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार

Share

मुंबई : क्रिकेट विश्वचषकानंतर (Cricket world Cup 2023) आता सर्वत्र आयपीएलची (IPL) उत्सुकता आहे. विश्वचषकात भारताचं नेतृत्व करणार्‍या रोहित शर्माचं (Rohit Sharma) ट्रॉफी उंचावण्याचं स्वप्न तुटल्यामुळे चाहते त्याला आयपीएलमध्ये पाहण्यासाठी उत्सुक होते. पण आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार (Mumbai Indians Captain) म्हणून दिसणार नाही. त्याच्याऐवजी हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. दुखापतीमुळे हार्दिकला विश्वचषक अर्ध्यातून सोडावा लागला होता पण आता तो आयपीएल गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

रोहित शर्माने २०१३ पासून मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. त्याच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं. पण, यापुढे मुंबईचा संघ हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. सुरुवातीला गुजरात टायटन्समध्ये (Gujrat Titans) असलेल्या पांड्याला १५ कोटी रुपयांमध्ये २०१५ मध्ये मुंबईने गुजरात संघाकडून ट्रेड केले होते. त्यानंतर हार्दिक पांड्या कर्णधार होणार अशी चर्चा होती. आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मुंबई इंडियन्सचे ग्लोबल हेड ऑफ फरफॉर्मन्स प्रमुख माहेला जयवर्धने म्हणाले, ”मुंबई इंडियन्ससाठी भविष्याच्या तयारीच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. सचिन तेंडुलकर ते हरभजन सिंग आणि रिकी पाँटिंग ते रोहित शर्मा यासारख्या दिग्गजांचे मुंबई इंडियन्सला नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने यशाची शिखरं पादाक्रांत केली आहेत. आता भविष्याचा विचार करताना निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यामुळे हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली गेली आहे”.

पुढे ते म्हणाले, “रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. २०१३ पासूनचा मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याचा कार्यकाळ अविश्वसनीय होता. त्याच्या नेतृत्वाने संघाला अतुलनीय यशच मिळवून दिले नाही तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणून त्याचे स्थान पक्के केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी संघ बनला. त्याचा अनुभव व मार्गदर्शन यापुढेही संघाला मजबूत करण्यासाठी मिळत राहणार आहे”, असं जयवर्धने म्हणाले.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

10 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

11 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

12 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

12 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

12 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

13 hours ago