सन १९६५ सालापासून माझे वडील शिवराम आत्माराम भाटकर व माझी आई वालावल गावी आल्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिराजवळील तळ्यात आंघोळ केल्यानंतर देवदर्शनाला जात. एकदा आंघोळ करून देवदर्शनाला जाताना प.पू. राऊळ महाराज त्यांच्यासमोर दत्त म्हणून हजर झाले. तेव्हा दोघांनीही महाराजांना नमस्कार केला. त्यांना आपल्या येण्याचा उद्देश सांगितला. त्यांनी महाराजांना सांगितले की, त्यांना वालावल गावातच घर असलेली जागा घ्यायची आहे. महाराजांनी आशीर्वाद देऊन त्यांना सांगितले, तुमच्या मनासारखे होईल.
थोड्याच दिवसात तेथे त्या गावातील घर असलेली जमीन विकण्यासाठी तेथील एक ब्राह्मण माधव सदाशिव जड्ये आले. ती जमीन महाराजांनी शिवराम भास्कर या दांपत्याला मिळवून दिली. त्याचप्रमापणे माझे भाऊ श्रीपाद शिवराम भास्कर यांचे लग्नाचे कुठेच जमत नव्हते. खूप मुली पाहिल्या. पण एकही ठिकाणी लग्नाचे जुळेना. म्हणून माझे वडील माझ्या भावाला घेऊन प.पू.राऊळ महाराजांकडे गेले. आपली अडचण सांगितली तेव्हा महाराजांनी सांगितले, तुम्ही घाबरू नका लवकरच लगीन जमून जाईल. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच गावच्या एका सुशिक्षित मुलीशी माझ्या भावाचे लग्न लागले. आता आमचे सर्व कुटुंब राऊळ महाराजांच्या आशीर्वादाने व कृपाप्रसादाने सर्व सुख-संपन्न आहे.
– समर्थ राऊळ महाराज
बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…
कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…
हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…
कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…
मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…
मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…