मुंबई : ‘फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा आज संकटात आहे. त्याला या संकटातून बाहेर काढावे’, असे कळकळीचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी सोमवारी विधानसभेत केले.
अर्थसंकल्पावरील विभागवार चर्चेत कृषी विभागावर ते बोलत होते. यंदा आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २५ फेब्रुवारीपासून ९ मार्चपर्यंत कोकणात ३५ ते ३९ डिग्री तापमान होते. त्यामुळे अनेक ठिकाणी आंब्याचे पीक भाजून मोहोर गळून पडला. त्यामुळे प्रत्यक्षात आंब्याचा फक्त दहा टक्के माल हाती लागला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये आवक वाढल्याने दलाल दर पाडत आहेत. त्यामुळे आंबा उत्पादक कर्जबाजारी होत आहे. त्यातच दक्षिणेकडील आंबा कमी भावात उपलब्ध होत असल्यामुळे कोकणातील आंबा उत्पादकांची अवस्था बिकट झाली आहे, असे ते म्हणाले.
पीक कर्जाचा हप्ता नोव्हेंबरमध्ये घेतला जातो. यामध्ये देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईचे निकष कोकणासाठी बदलणे गरजेचे आहे. कोकणासाठी फळ पिकासाठी किमान तापमान बाराऐवजी १७ डिग्री असावे, फळ पिकाच्या पीक कर्जाचा कालावधी १ ऑक्टोबर ते ६ जून असावा, अवकाळी पाऊस, हवामानातील बदल, मोहोर गळू नये म्हणून कीटकनाशकांची वारंवार होत असलेली फवारणी, याची दखलही नुकसानभरपाई देताना विमा कंपनीने तसेच सरकारने घेतली पाहिजे आणि शेवटच्या टप्प्यातील आंबा उत्पादनाचा हमीभाव निश्चित करायला हवा, असेह नितेश राणे म्हणाले.
पाहा तुमची रास आहे का यात? मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, दोन दिवसांनंतर अत्यंत शुभ राजयोगाची निर्मिती…
काही ट्रेन्स रद्द, तर काही उशिराने, पाहा वेळापत्रक मुंबई : रेल्वेचा मेगा ब्लॉक म्हटलं की…
मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…
देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…
कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…