मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी आणि गांधी कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांची चौकशी न्यायालयाच्या निर्णयानुसार झाली आहे. परंतु, संपूर्ण देशभरात आंदोलने करून देशातील जनतेला वेठीस धरण्याचे काम काँग्रेसने केले आहे.
५ हजार स्वातंत्र्यसैनिकांनी तयार केलेल्या एजीएलमध्ये २ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. एजीएल ही कंपनी १९३८ मध्ये तयार झाली होती. स्वातंत्र्यसंग्रामात स्वत:चे वृत्तपत्र असावे म्हणून स्वातंत्र्यसेनानींनी एजीएलची स्थापना केली होती. ही राष्ट्रीय संपत्ती असून खासगी संपत्ती नाही. २०१० मध्ये राहुल गांधी कुटुंबाने यंग इंडिया नावाची कंपनी स्थापन केली आणि एजीएलची संपत्ती यंग इंडियाला ट्रान्सफर केली. काँग्रेसने चौकशीचा बाऊ करण्याऐवजी चौकशीला सामोरे जायला हवे होते असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर यात भ्रष्टाचार झाल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर ईडीने राहुल गांधी यांची चौकशी केली. काँग्रेसने याचा बाऊ करण्यापेक्षा चौकशीला सामोरे गेले पाहिजे. स्वातंत्र्य सैनिकांची संपत्ती हडप करणे गुन्हा आहे. परंतु, हा गुन्हा गांधी कुटुंबाने केला आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…