मुंबई (वार्ताहर) : कसोटी क्रिकेटचे भविष्य धोक्यात असल्याची चर्चा मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहनेही टी-२० क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेट धोक्यात असल्याचे म्हटले आहे.
युवराज सिंह म्हणाला की, सध्याचे क्रिकेटप्रेमी टी-२० क्रिकेटला अधिक पसंत करत आहेत. त्यामुळे कसोटी क्रिकेटमधील रोमांच कमी होत आहे. आजकाल अनेकांना टी-२० क्रिकेट खेळणे आणि पाहणे अधिक आवडते. त्यात टी-२० क्रिकेट सामन्यांमध्ये पैसाही मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने अधिक क्रिकेटर्स या क्रिकेट फॉर्मेटमध्ये अधिक रस घेत आहेत. कसोटी आणि टी-२० ची तुलना करताना का कोणता खेळाडू ५ लाखांसाठी ५ दिवस खेळणे पसंत करेल असेही युवराज म्हणाला.
युवराज सिंह पुढे म्हणाला की, सद्यस्थितीला सर्व दिग्गज खेळाडू जे भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत नाहीत, पण टी-२० क्रिकेट खेळून कोट्यवधी कमावत आहेत. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या अनेक देशांची स्वत:ची टी-२० लीग देखील आहे. युवराजच्या मते ज्या वेगाने टी-२० क्रिकेट वाढत आहे.
मुंबई: उन्हाळ्यात प्रमाणापेक्षा आल्याचा वापर शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला विस्ताराने सांगणार आहोत…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर जोरदार टिका यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा मुंबई…
नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा…
आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या मग मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले आता बोटाच्या…
ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…
बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…