नवरात्रौत्सवात आदिवासींच्या संसाराला श्रमाची फुले; कमळाच्या विक्रीतून आर्थिक आधार

Share

शहापूर (वार्तहर) : पोटाची खळगी भरण्यासाठी सतत कष्टप्रद काम करणाऱ्या तालुक्यातील आदिवासी बांधवांना नवरात्रौत्सवात कमळ फुलांच्या विक्रीतून मोठा आर्थिक आधार मिळत आहे. चिखलात रुतून बसलेले कमळ काढण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता आदिवासी बांधव चिखल, गाळात, तलावातील खोल पाण्यात उतरून एक एक कमळाची फुले काढून ती एका टोपलीत गोळा करतात व शहरात आणून नवरात्रौत्सवात ती विकून रोजीरोटीची कमाई करणे हा त्यांचा नित्याचाच दिनक्रम होय.

शहापूर तालुक्यातील आदिवासी महिला दरवर्षी नवरात्रौत्सवात कमळाची फुले विकत असतात. यातून नवरात्रीच्या नऊ दिवसांत त्यांना मोठा आर्थिक आधार आणि रोजगार मिळतो. नवरात्रौत्सवात देवीच्या चरणी वाहण्यासाठी मोठ्या श्रद्धेने नऊ दिवस भाविकांकडून कमळाच्या फुलांना प्रचंड मागणी असते. ही कमळाची फुले शहापूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आदिवासी महिला आणत आहेत.

सध्या शहापूरातील अंबिकामाता मंदिराबाहेर आदिवासी महिला कमळाची फुले १० रूपयांना एक अशा माफक दराने विक्री करून नवरात्रौत्सवात रोजगार कमवित आहेत. शहापूर तालुक्यातील लहान तलाव व ओहोळाच्या काठावरील चिखलात ही कमळाची फुले उगवतात. ही फुले पाण्यात उतरून मोठ्या मेहनतीने काढून टोपलीत भरून शहापूर शहरात ती विक्रीसाठी आणली जातात.

कमळाची फुले मिळवण्यासाठी भल्या पहाटे तलाव गाठावा लागतो. तलावाच्या काठावरील चिखल तुडवित पाण्यात उतरून कमळ फुलांचा शोध घ्यावा लागतो. कमळाच्या फुलांबरोबर झेंडूची, खुरासनीची पिवळी फुलेही आदिवासी महिलांनी विक्रीसाठी सध्या आणली आहेत. दिवसभरात या फुलांच्या विक्रीतून ३०० ते ४०० रुपये कमाई होते, असे कमल निरगुडा या आदिवासी फुल विक्रेत्या महिलेने सांगितले.

Recent Posts

टी बी लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन, सांगली

सेवाव्रती: शिबानी जोशी स्वातंत्र्यानंतर भारत-पाकिस्तान फाळणीच्या झळा हजारो कुटुंबांना बसल्या. अनेक कुटुंब निराधार झाली. सिंध…

10 mins ago

Garlic: लसूण खाल्ल्याने वाढेल तुमचे आयुष्य, मात्र अशा पद्धतीने करा सेवन

मुंबई: आपल्या चांगल्या आरोग्यासाठी माणसाला ८ ते ८ तासांची झोप गरजेची असते. झोप पूर्ण न…

3 hours ago

मुंबईला २० ते २२ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

दोन धरणात शून्य टक्के पाणीसाठा सातपैकी पाच धरणांनी गाठला तळ मुंबई : मुंबईला २० ते…

3 hours ago

मुंबई आशियातील २१ वे सर्वात महागडे शहर

मुंबई : मुंबई आशियातील २१ वे सर्वात महागडे शहर ठरले आहे, तर नवी दिल्ली आता…

4 hours ago

Gautam Gambhir : गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट, समोर आला हा फोटो

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४मध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या सहकारी पक्षांसोबत मिळून सलग तिसऱ्यांदा सरकार बनवले.…

4 hours ago

रत्नागिरीमध्ये १९ जूनपासून पोलीस भरतीला सुरुवात

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ जून ते १ जुलै या कालावधीत पोलीस भरती प्रक्रिया राबविली…

4 hours ago