नवी मुंबईत रोगमुक्तीसाठी लाखो उंदरांचा खात्मा

Share

नवी मुंबई (प्रतिनिधी) : प्लेग आणि लेप्टोस्पायरोसिससारखे जीवघेणे आजार पसरवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या १ लाख ९६ हजार उंदरांचा खात्मा नवी मुंबई महानगरपालिकेच्या मूषक नियंत्रण विभागाने केला आहे. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत ‘मूषक नियंत्रण’ विभागाच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली. लेप्टोस्पायरोसिसला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.

पालिकेकडून शहरातील नागरिक रोगमुक्त राहावेत, म्हणून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यामध्ये स्वच्छ अभियान अंतर्गत शहरात घुशी व उंदरावर प्रतिबंध यावे म्हणून झिरो कचरा कुंडी ही अभिनव योजना राबविली. तसेच हागणदारी मुक्त शहर व्हावे, या उद्देशाने स्वच्छ भारत अभियानास सुरुवात झाल्यापासून मागील सहा वर्षे घनकचरा व्यवस्थापन प्रशासन अविरत मेहनत घेत आहेत. त्यातच मूषकामुळे रोगराईला आमंत्रण मिळू नये, हा प्रमुख हेतू समोर ठेवून मागील एक वर्षात दोन लाखांच्या आसपास उंदरांचा खात्मा मूषक नियंत्रण विभागाकडून करण्यात आला आहे.

नवी मुंबईत उंदरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. उंदरामुळे नवी मुंबईकरांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर पालिकेने उंदरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मूषक नियंत्रण विभाग स्थापन केला आहे. वाढत्या उंदरांच्या संख्येला आळा बसवण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. उंदरांचा प्रादुर्भाव आढळणाऱ्या या ठिकाणी विषारी गोळ्या टाकून उंदीरनाशक मोहीम राबवण्यात येत आहे. झोपडपट्टी किंवा गावठाणामध्ये गटारीतच किंवा उघड्यावर टाकण्यात येत असलेल्या कचऱ्यामुळे उंदीर, घुशीला खाद्य मिळत आहे.

उंदीर, घुशीचे प्रमाण झोपडपट्टी व गावठाण भागात अधिक आहे. मूषक पकडण्याठी अॅल्युमिनियम फॉस्फाइट, झिंक फॉस्फाइट, ब्रोमेडिओलॉनी केक अशा औषधांचा वापर करून त्यांचा खात्मा करण्यात येतो. तर पिंजरे, ग्ल्यूटेप, धुरीकरण करूनही उंदरांना मारले जाते. तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांना दंडही ठोठावण्यात आला आहे.

मूषक नियंत्रण मोहिमेमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदाराला २ लाख २३ हजार ५८० रुपयांचा दंड लावण्यात आल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीराम पवार यांनी दिली.

Recent Posts

केजरीवालांची स्टंटबाजी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राजकीय सारीपाटावरील वाटचाल पाहता त्यांच्याबाबतीत ‘कोण होतास तू, काय झालास…

2 hours ago

श्रीराम व्यायामशाळा सेवा संस्था, ठाणे

सेवाव्रती: शिबानी जोशी ठाण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा ज्या ठिकाणी सुरू झाली, ते ठिकाण…

2 hours ago

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोषाचा उद्रेक

प्रा. डॉ. विजयकुमार पोटे दोनशे रुपये लिटर दूध, पैसे मोजूनही न मिळणारे पीठ, जीवनावश्यक वस्तूंचा…

3 hours ago

IPL 2024 Final: चेन्नईमध्ये होणार फायनल, तिकीटांची विक्री सुरू, कितीचे आहे स्वस्त तिकीट

मुंबई: आयपीएल २०२४चा प्लेऑफचा टप्पा २१ मेपासून सुरू होत आहे. सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स,…

5 hours ago

Health: दररोज आवळ्याचे सेवन करण्याचे हे आहेत चमत्कारी फायदे

मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा…

6 hours ago

राज्यात शांततेत मतदान पार; आता उत्सुकता निकालाची

मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…

6 hours ago