मुंबईत साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले

Share

मलेरिया, डेंग्यूसह स्वाईन फ्लूचाही धोका!

मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा फैलाव झपाट्याने होत असून, स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात स्वाईन फ्लूच्या ५६ रुग्णांची नोंद झाली आहे, तर मलेरिया २२६, डेंग्यू १५७, लेप्टोचे ७५ रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली, तरी पावसाळी आजार बळावत असल्याने साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत.

जून महिना कोरडा गेल्याने यंदा पावसाळ्यात उद्भविणाऱ्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव कमी होईल असे वाटत होते. मात्र, संपूर्ण जुलै महिन्यात डेंग्यूचे ५७९, मलेरियाचे ७२१, लेप्टोचे ३७७, गॅस्ट्रोचे १६४९, कावीळ १३८, स्वाईन फ्ल्यू ८६ आणि चिकनगुनियाचे २४ रुग्ण आढळले होते. ही रुग्णवाढ ऑगस्टमध्येही कायम असून, सर्वच पावसाळी आजारांची संख्या वाढल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

तीन हजार खाटा तैनात

पावसाळी आजारांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयात एकूण तीन हजार बेड तैनात ठेवण्यात आले आहेत. यामध्ये उपनगरीय रुग्णालयात विशेष ५०० बेडही तैनात आहेत. तसेच संध्याकाळी ४ ते ६ वा. पर्यंत ओपीडी सुरू ठेवण्यात येत आहे. शिवाय, कीटकनाशक विभागाकडूनही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धूम्र फवारणी मोहीम व्यापकपणे राबविण्यात येत आहे.

आठवड्याभरात आढळलेले रुग्ण

मलेरिया २२६
डेंग्यू १५७
लेप्टो ७५
स्वाईन फ्लू ५६
गॅस्ट्रो २०
चिकनगुनिया – ९
कावीळ ६

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Kalyan News : रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांचा खड्ड्यात बसून ठिय्या

योगिधाम परिसरात मुख्य रस्त्यात खड्डा खणल्याने नागरिक संतप्त कल्याण : कल्याण पश्चिमेतील योगिधाम परिसरात नुकताच…

2 hours ago

Sikkim Rain : सिक्कीममध्ये पावसाच्या थैमानात महाराष्ट्रातील २८ जण अडकले!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; अडकलेल्यांशी संपर्क साधत दिला धीर डेहराडून : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी…

2 hours ago

शासन, सिडकोकडून नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांची फसवणूक

गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याची मागणी नवी मुंबई : नवी मुंबई मधील ९५ गावातील मुळ…

2 hours ago

Patana news : गंगा स्नानासाठी १७ भाविकांना घेऊन निघालेली बोट नदीत बुडाली!

१३ जणांना वाचवण्यात यश तर ४ जण बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरु पाटणा : गेल्या काही…

3 hours ago

NCERT : बाबरी मशिदीचा उल्लेख ‘तीन घुमट रचना’, अयोध्या वाद चारवरुन दोन पानांवर!

एनसीईआरटीच्या बारावीच्या राज्यशास्त्र पुस्तकात अनेक मोठे बदल मुंबई : एनसीईआरटीचे (National Council of Educational Research…

3 hours ago

Salman Khan : गोळीबारानंतर बिश्नोई गँगची भाईजानला जीवे मारण्याची धमकी!

मुंबईच्या साऊथ सायबर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan)…

4 hours ago