कोकणात या पर्यटनाचा आनंद घ्या !

Share

माझे कोकण : संतोष वायंगणकर

कोरोनामुळे घातलेले निर्बंध महाराष्ट्र सरकारने अनेक बाबतीत शिथिल केले आहेत. उपाहारगृह, हॉटेल्स आदी बाबतीतील शिथिलता होत असल्याने साहजिकच या दिवाळीला मोठ्या संख्येने लोक पर्यटनासाठी बाहेर पडतील. गेल्या दीड वर्षात लोकांना इच्छा असूनही घराबाहेर पडता आलेले नाही. आजही थोड्याफार प्रमाणात कोरोनाचे सावट जाणवते; ते तिसऱ्या लाटेचे संकट आहे की नाही? हे आजही सांगणे सर्वांनाच अवघड आहे. मात्र, तरीही काहीसा मोकळा श्वास सोडला गेला आहे. निर्बंधांची चौकट काहीशी शिथिल झाल्याने त्याचा सकारात्मक परिणाम विविध दृष्टीने जाणवत आहे.

कोकणातील उद्योग, व्यवसायालाही गेली सुमारे दोन वर्षे फार वाईट गेली आहेत. जे जगभरात परिणाम झाले, परिणाम जाणवले त्याच परिणामांची बऱ्यापैकी झळ कोकणातील व्यावसायिकांनाही अनुभवली आहे. या सर्व आर्थिक संकटातून सावरण्यासाठी कोकणातील पर्यटन व्यवसाय, हाच पर्याय आहे. आजही पर्यटन व्यवसायाच्या बाबतीत फार गांभीर्याने विचार करताना कोणी दिसत नाहीत. या पर्यटन व्यवसायातून रोजगाराच्या विविध संधी निर्माण होणाऱ्या आहेत. या निर्माण होणाऱ्या संधीचा विचार करून त्यादृष्टीने आपली पावले पडली पाहिजेत. यातून सावरून कोणत्याही स्थितीत उभारी घेण्याचाच विचार करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून निश्चित काही चांगलं घडेल.

कोकणातील पंचतारांकित हॉटेल प्रकल्पांचा प्रश्न गेली काही वर्षे प्रलंबित आहेत. ताज, ओबेरॉय ग्रुपचे हे प्रकल्प जर उभे राहिले, तर खऱ्या अर्थाने पर्यटन व्यवसायाला अधिक गती मिळेल. चर्चेत आणि विरोधात, राजकीय इश्यू म्हणून हे प्रकल्प अडकले आहेत. ‘कोकणचा विकास’ या एका वाक्यावरच हे हॉटेल प्रकल्प उभे होऊ शकतील. राजकारणाची आता ‘अति खाल्लं आणि अजिर्ण झालं’ अशीच काहीशी अवस्था झाली आहे. त्यामुळे कोकणातील प्रकल्प विकास, पर्यटन व्यवसायाची उभारणी यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत कोरोना निर्बंधामुळे सगळीच बंधनं होती. जरी मास्क वापरण्याचे बंधन असले तरीही निर्बंधांच्या शिथिलतेने सर्वांनाच फार मोठा दिलासा मिळाला आहे.

कुठलेही संकट कधी सांगून येत नाही. ते अचानकपणे दत्त म्हणून दारात उभे राहाते. कोरोना विषाणूचे संकट जगासमोर उभे राहिले. कोणाला काही समजण्यापूर्वीच अखंड जगाला कोरोनाचा विळखा केव्हा पडला कोणालाच समजले नाही. यामुळे जी संधी मिळते, जे दिवस हाती येतात, त्या कालावधीत भरपूर कष्ट करून काही उभारणी करण्याचा प्रयत्न व्हायला हवा आहे. गेली दोन वर्षे कसं जगायचं या विवंचनेत आणि विचारात गेली आहेत; परंतु आता विवंचना न करता फक्त आपणाला प्रगतीच्या नव्या वाटेने अधिक गतीमानतेने पळायचे आहे. आर्थिक सक्षमतेने उभं राहण्यासाठी निश्चितच अधिक गतीमानतेने प्रयत्न झाले तरच सक्षमतेने उभारणी होऊ शकेल.

कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठी आहे. यातील महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. गुजरात, मध्य प्रदेश इकडूनही पर्यटक येत आहेत. गोवा राज्यात येणारे पर्यटकही मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर येत आहेत. सुरुवातीला गोव्यातील पर्यटक नकोत; कोकणची संस्कृती बिघडेल, असे म्हटले जायचे; परंतु संस्कृती बिघडायला आपली संस्कृती काही इतकी तकलादू आहे का? फक्त व्यावसायिकता एवढंच आपलं त्यामागचं धोरण असायला हवं. ज्यांना मनापासून दारू प्यायची असते, तेच दारू पितात. ‘मित्रांचा आग्रह’, ‘मित्रांनी बिघडवले’ हे सगळं खोटं असतं. आपला आपल्या मनावर ताबा असेल, तर मित्र आपणाला काय बिघडवणार? त्यामुळे कोणी सांगून, म्हणून कोणी काही बिघडण्याची आवश्यकता आणि शक्यताही नसते. त्यामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकाला पर्यटनस्थळांचा इथल्या निसर्गाचा पुरेपूर आनंद कसा मिळेल, हे पाहणे अधिक आवश्यक आहे. एकदा आलेला पर्यटक वारंवार कोकणात यायला हवा. असा आपला आग्रह आणि आदरातिथ्य असावे.

कोकणातील पर्यटनस्थळांची माहिती प्रत्येक हॉटेल, उपाहारगृहे यामध्ये उपलब्ध असायला हवीत. हॉटेलमध्ये, एखाद्या दुकानात पर्यटक आल्यावर त्या दुकानातील पर्यटनस्थळांची माहिती पाहून कोकणातील अन्य पर्यटनस्थळं पाहायला हवीत, असा मोह त्या पर्यटकांना पडला पाहिजे. आताच मार्केटिंगचं जग आहे. जर मार्केटिंग केल्याशिवाय कोणताही व्यवसाय उभारी घेणार नाही. कोणत्याही व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहोचल्याशिवाय त्याला ग्राहक प्राप्त होणार नाही. या दिवाळीत कोकणात पर्यटक मोठ्या प्रमाणात यायला पाहिजेत. यासाठी कोकणाने आपले स्वतंत्र मार्केटिंग तंत्र वापरले पाहिजे. यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून कोकण आणि कोकणातील पर्यटनस्थळ तूर्तास देशभर पोहोचविली पाहिजेत. तरच, कोकणात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतील आणि कोकणवासीयांना आर्थिक सक्षमतेतून दिवाळी साजरी करता येईल.

santoshw2601@gmail.com

Recent Posts

DC vs RR: सॅमसंगचा वादग्रस्त झेल, दिल्लीसमोर राजस्थान फेल…

DC vs RR: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेला सामना दिल्लीसाठी खूपच महत्त्वाचा आहे.…

16 mins ago

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात शांततेत मतदान

महायुतीच्या कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह सिंधुदुर्ग : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात…

1 hour ago

देशात तिसऱ्या टप्प्यात ६१ टक्के तर महाराष्ट्रात ५४.०९ टक्के मतदान

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. यामध्ये १२ राज्ये आणि…

2 hours ago

कडिपत्ता खाण्याने दूर होतात हे आजार

मुंबई: कडिपत्त्याचे सेवन खाण्यापासून ते अनेक औषधांमध्ये केला जातो. यातील अनेक औषधीय गुण अनेक आजारांमध्ये…

2 hours ago

काँग्रेसकडून कसाबचे समर्थंन हे देशासाठी धोकादायक

पंतप्रधान नरेंद्र मोदींने ओढले काँग्रेसच्या पाकिस्तानधार्जिण्या भूमिकेवर आसूड नगर : मुंबईवर झालेल्या २६/११ सागरी हल्ला…

3 hours ago

मतांच्या लाचारीमुळे उद्धव ठाकरे बसले गप्प; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

मुंबई : पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? असा सवाल आता…

3 hours ago