नोएडा : गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) नोएडा येथे झालेली रेव्ह पार्टी (Rave Party) चर्चेत आली आहे. या पार्टीमध्ये प्रसिद्ध युट्युबर (Youtuber) आणि बिग बॉस (Bigg Boss) विजेता स्पर्धक एल्विश यादवचे (Elvish Yadav) नाव जोडण्यात आले. त्याने या पार्टीसाठी साप आणि सापाचे विष (Snake Venom) पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला. सुरुवातीला एका व्हिडीओच्या माध्यमातून आपण असं काहीच केलं नसल्याचा दावा त्याने केला होता. मात्र, पोलिसांनी कसून तपास केला असता एल्विशने अखेर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याला अटक करण्यात आली. यानंतर त्याने हे कृत्य का केलं याचाही पोलीस चौकशीत खुलासा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा पोलिसांनी त्या पार्टी प्रकरणावरुन एल्विशवर एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा (NDPS Act) दाखल केला होता. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याच्यावर नोएडा (Noida Gurugoan Rave Party) आणि गुरुग्राम येथील रेव्ह पार्टीमध्ये सापांच्या विषाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. यात पोलिसांनी सापाचे विष वापरण्याचे कारण काय याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी असे म्हटले आहे की, त्याने केवळ आपल्या नावाची प्रसिद्धी आणि चर्चा व्हावी या उद्देशाने हे कृत्य केलं होतं.
एल्विशला सापाच्या विषाची तस्करी प्रकरणात पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. त्यानंतर रविवारी नोएडा येथील न्यायालयाने पुढील दोन आठवड्यांसाठी त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
सध्या एल्विशच्या आईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो (Elvish Yadav Mother Viral Video) आहे. त्यात त्याची आई रडताना दिसत आहे. एल्विशच्या बाबत जे काही घडले आहे त्यावरुन त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. त्याचे फॉलोअर्सही चिंतेत आहेत. भरपूर पैसे कमविण्याबरोबरच एल्विशने चाहत्यांना आपण कुणालाही घाबरत नाही हेही दाखवून दिले, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.
फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे काही लोकांना सतत खोटं बोलण्याची सवय असते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकदा सातत्याने…
इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झालेत. मुंबईसह महाराष्ट्रात सर्व…
मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सची अय्यर जोडीने कमाल केली. कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला हरवत दिमाखात आयपीएलच्या…
मुंबई: झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे रील बनवण्याच्या नादात तरुणाने १००…
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे नसल्याचे…
मुंबई: जमिनीवर ज्या पद्धतीने लोक बसतात ते एक प्रकारचे आसन असते. यामुळे शरीरास अनेक फायदे…