Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावरुन टीका करणाऱ्यांचे दात मोदींनी घशात घातले!

Share

मुख्यमंत्री शिंदे यांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका

ठाणे : अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी होणा राम मंदिराच्या उद्घाटनासाठी (Ayodhya Ram Mandir Inauguration) देशभरातील सर्व हिंदूधर्मीय (Hindu) प्रचंड उत्साही आहेत. विरोधक ज्या गोष्टीवरुन टीका करत होते, ती गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शक्य करुन दाखवली. दरम्यान, या सोहळ्यासाठी मीरा भाईंदर येथील रामसेना फाउंडेशनचे ३०० प्रभू श्रीराम भक्त कार्यकर्ते आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या पुढाकाराने मीरा भाईंदर ते अयोध्या हा प्रवास पायी करण्यासाठी आज मार्गस्थ झाले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) उपस्थित होते. यावेळी संवाद साधताना राम मंदिराच्या तारखेवरून पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता निशाणा साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, “काही जणांनी नरेंद्र मोदी यांच्यावर मंदिर वहीं बनाएंगे, तारीख नही बताएंगे म्हणत टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण अयोध्येत मंदिरही बनले आणि तारीखही ठरली आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांचे दात घशात घालून दाखवण्याचे काम मोदी यांनी केले,” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, “वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे स्वप्न आता पूर्ण होत असून येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ही आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असून अभूतपूर्व असा क्षण अनुभवण्यासाठी मीरा भाईंदर ते अयोध्या अशी पदयात्रा ४१ दिवसात पूर्ण करून २१ जानेवारी रोजी हे सारे अयोध्येत पोहोचणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रत्येक हिंदूच्या मनातील राम मंदिराचे स्वप्न पूर्ण करून दाखवले असून आधी हर घर मोदी हा नारा आता मन मन मोदी असा बदलला आहे,” असे पंतप्रधानांबद्दल मुख्यमंत्र्यांनी गौरवोद्गार काढले.

“पायी निघालेल्या ३०० रामभक्तांना प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये याची सर्व खबरदारी घेण्यात आली असून, जागोजागी त्यांची जेवण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जमेल तिथे शिवसैनिकांनीही त्यांचे स्वागत करून त्यांना जमेल ते सहकार्य करावं,” असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. तसंच २२ जानेवारी रोजी आपल्या साऱ्यांना अयोध्येत नक्की भेटू, असा शब्दही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, विक्रम प्रताप सिंह तसेच शिवसेनेचे मीरा भाईंदर येथील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Recent Posts

Heatwave in India : देशभरात उष्णतेची लाट; तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचणार! तर काही भागात मुसळधार!

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा…

30 mins ago

उद्धव ठाकरे डरपोक, पराभव दिसू लागल्याने डोक्यावर परिणाम झाल्यामुळे निराधार आरोप; आशिष शेलारांचे टीकास्त्र

आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या मग मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले आता बोटाच्या…

1 hour ago

Sanjay Raut : पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल!

ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

4 hours ago

Accident news : चारधामसाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला अन्…

बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…

5 hours ago

Mihir kotecha : लोकसभेच्या गेटबाहेर गुटखा विकणारा खासदार पाठवायचाय की तुमचा सेवक पाठवायचाय?

कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…

5 hours ago

Kolhapur news : मुलाला वाचवताना तिघांचा नदीत बुडून मृत्यू! कोल्हापुरात घडली भीषण दुर्घटना

हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…

6 hours ago