संजय भुवड
महाड : केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाअंतर्गत स्वामित्व योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात गावठाण जागेत राहणाऱ्या नागरिकांना त्या जागेचा मालकी हक्क प्राप्त होणार आहे. महाड तालुक्यातील १७७ गावांमध्ये अशा प्रकारचे सर्व्हेक्षण ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने केले जाणार असून २२ मार्च २०२२ पासून या ड्रोन सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली आहे.
ग्रामीण भागात गावठाणात घरे बांधून राहणाऱ्या रहिवाशांकडे केवळ जोत्याची मालकी आहे. जोत्याखाली असणारी जमीन शासनाच्या मालकीची होती. या जमिनीचे स्वामित्व म्हणजे मालकी त्यावर राहणाऱ्या व गेली अनेक वर्षे वहिवाट असणाऱ्या रहिवाशाला मिळावी, या उद्देशानेच केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयामार्फत स्वामित्व योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार ग्रामीण भागातील गावठाणांचा सर्व्हे केला जाणार आहे.
महाड तालुक्यातील १७७ गावांतील गावठाणांचा सर्व्हे ड्रोनच्या माध्यमातून केला जाणार आहे. यासाठी भूमी अभिलेख खात्यातील ५ कर्मचारी व डेप्युटेशनवरील ६ कर्मचारी या सर्व्हेचे काम करत असून आजअखेर विन्हेरे, खाडीपट्टा व रायगड विभागातील ८० गावांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. ड्रोनद्वारे सर्व १७७ गावांतील गावठाणांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन जागाधारकाची चौकशी अधिकाऱ्यामार्फत सत्यापन पडताळणी केली जाणार आहे.
या सत्यापन पडताळणी दरम्यान ग्रामस्थांकडून शासकीय चौकशी अधिकाऱ्यांना मिळणारे सहकार्य महत्त्वाचे असणार आहे. ही सत्यापन पडताळणी पूर्ण झाल्यानंतर घराखालील असणारी जागा त्या धारकाची होणार असून त्या जागेची सनद शासनाकडून धारकाला दिली जाणार आहे. याचवेळी घरालगत असणारी झाडे / आमराईची जागा शासन जमा करण्यात येणार असल्याची माहिती भूमी अभिलेख महाड कार्यालयातून देण्यात आली.
मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…
कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…
नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…
अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024…
दिल्लीत आयकर विभागाची मोठी कारवाई नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात (Election period) काळा पैसा सापडण्याच्या…
महाराष्ट्र अजूनही मतदानात मागेच... मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर…