नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणि निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
या निर्णयानुसार वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी मुलभूत वेतन, निवृत्तीवेतनावर सध्या २८ टक्के दराने दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्याव्यतिरिक्त हा अधिकचा ३ टक्के भत्ता असेल आणि तो १ जुलै २०२१ पासून देय असणार आहे.
सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारसीवर आधारित स्वीकृत सूत्रांनुसार ही वाढ देण्यात आली आहे. महागाई भत्ता आणि दिलासा निधीपोटी देशाच्या तिजोरीवर दर वर्षी ९,४८८.७० कोटी रुपयांचा बोजा पडणार असून सुमारे ४७ लाख १४ हजार केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६८ लाख ६२ हजार निवृत्तीवेतनधारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
हिंमत असेल तर 'या' पाच प्रश्नांची उत्तरं द्या बोचरी टीका करत चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव…
पुढील चार दिवस 'असं' असेल वातावरण, जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई: राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान…
लाडक्या पुष्पाला पाहण्यासाठी हजारो चाहते गोळा झाले आणि... नेमकं काय घडलं? हैदराबाद : दाक्षिणात्यच नव्हे…
उत्तर प्रदेश : एकीकडे कडकडत्या उन्हाच्या झळा तर दुसरीकडे अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) अशा बदलत्या…
मुंबई: जीवनात यश मिळवण्यासाठी लोक हरतऱ्हेचे प्रयत्न करत असतात मात्र इतके करूनही यश मिळत नाही.…
मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक प्लान्सचे पर्याय मिळतात. कंपनी प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्रकारचे प्लान्स…