मुंबईकरांना आपत्तीची माहिती देणारे अॅप सेवेत

Share

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट बीएमसी’ हे अॅप्लीकेशन मंगळवारपासून मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. मुंबईकर हे अॅप प्ले स्टोरमधून डाउनलोड करून वापरू शकतात.

दरवर्षी मुंबईत पावसाळ्यात धोकादायक परिस्थिती उद्भवते. यासाठी पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून डाउनलोड करून मुंबईकर हे अॅप वापरू शकणार आहेत. मुंबईकरांना आपत्तीची माहिती देण्यासोबत संकटात सापडलेल्या नागरिकाची माहिती एका क्लिकवर त्याच्या नातेवाईकांना समजणार असल्याने मुंबईकरांसाठी हे अॅप उपयोगी ठरणार आहे.

या अॅपमध्ये जवळच्या नातेवाईकांचे, मित्रांचे मोबाईल क्रमांक जतन करण्याची सुविधा आहे. विशेष म्हणजे मुंबईतील पावसाळी परिस्थितीची माहिती देखील या अॅपवर उपलब्ध असेल. त्यामुळे मुंबईतील पावसाचा १५ मिनिटांचा, दर तासाचा तसेच २४ तासांचा अद्ययावत अहवाल उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या अॅपच्या माध्यमातून विविध भागात पडलेल्या पावसाची माहिती देखील तत्काळ व सहजपणे जाणून घेता येणार आहे.

अॅप कसे चालणार?

पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्धभवल्यानंतर या ॲपवर असणाऱ्या एसओएस सुविधेचा वापर करण्यासाठी त्याला एक क्लिक करायचा आहे. त्यानंतर लगेच ॲपवर जतन असलेल्या मोबाइल क्रमांकावर आपल्या भौगोलिक स्थानाच्या माहितीसह लगेचच लघुसंदेश जाणार आहेत. यामुळे संबंधित व्यक्तीला लगेच मदत मिळू शकणार आहे.

ॲपमध्ये असणाऱ्या ‘इमर्जन्सी बटनावर क्लिक केले असल्यास संकटात सापडलेला नागरिक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणच्या ५०० मिटर परिसरातील रुग्णालये, अग्निशमन केंद्र, पोलीस ठाणे तसेच महापालिकेच्या विभाग कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक उपलब्ध होणार आहेत.

Recent Posts

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

3 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

6 hours ago

अवयवदान प्रबोधनाची चळवळ

कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…

7 hours ago

आरोग्य विम्यासाठी वयाची अट काढली, पण…

अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत मागच्या महिन्यात एक महत्त्वाची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली, ती म्हणजे…

7 hours ago

पहिल्या चार टप्प्यातच झालाय महाविकास आघाडीचा सुपडा साफ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा मुंबई : महाराष्ट्रात चार चरणांच्या निवडणूक पूर्ण झाल्या आहेत. २०…

11 hours ago