भाईंदर : सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याला सलाम म्हणून मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात येत्या काळात बनविण्यात येणाऱ्या वास्तूंपैकी एका वास्तूचे नामकरण त्यांच्या नावाने व्हावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मिरा-भाईंदर शहर अध्यक्ष हेमंत सावंत यांनी पालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडे केली आहे.
ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची माय सिंधुताई यांच्या निधनानंतर मीरा भाईंदर शहरात मंगळवारी सायंकाळी ऑरेंज हॉस्पिटल, मिरारोड (पूर्व) येथे त्यांच्या फोटोला हार लावून,मेणबत्या पेटवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्या ठिकाणी कार्यक्रम झाला. त्याच ठिकाणी माईचा आशीर्वाद व त्यांची सावली सदैव आपल्या सोबत राहावी म्हणून झाडे लावण्यात आली मात्र पालिकेच्या एखाद्या वास्तुला त्यांचे नाव दिले तर कायम त्यांचे नाव लोकांच्या मनात कायम राहील, अशी मनसेची मागणीआहे.
मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. अनेकदा लोक आपले लक्ष्य मिळवण्यासाठी खूप प्रयत्न…
मुंबई: मोबाईल फोन(mobile phone) आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनत चालला आहे. याशिवाय आपले आयुष्यच हल्ली…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी शके १९४६, चंद्र नक्षत्र रेवती. योग प्रीती. चंद्र राशी…
कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ७ मे रोजी मतदान आहे. गेले दीड महिना भाजपाचे उमेदवार…
अरुण बेतकेकर (माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना) अठराव्या लोकसभेच्या ५४३ सदस्यांना निवडण्यासाठी,…
विश्वरंग: उमेश कुलकर्णी काही देशांत विद्यार्थी चळवळींनी देशातील राजकारण बदलून टाकले आहे. विद्यार्थी रस्त्यावर उतरले,…