Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी रोज हादरतेय डहाणू !

Share

डहाणू (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यातील डहाणू भूकंपाच्या (Earthquake) धक्क्यांनी हादरले असून बुधवारी डहाणूला भूकंपाचा धक्का जाणवला. या धक्काची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गेल्या तीन दिवसांत पुन्हा भूकंपाचे धक्के सुरू असून, सोमवारी पहाटे, मंगळवारी सकाळी ६ वाजता तर बुधवारी चार वाजून चार मिनिटाला भूकंपाचा धक्का जाणवला. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा भूकंपाचे धक्के बसू लागल्याने पुन्हा येथिल नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. डहाणू, तलासरी, बोर्डी, कासा, चारोटी, उर्से या जवळपास २५ ते ३० किलोमीटर परिसरात हा धक्का जाणवत आहेत.

पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरीमध्ये सध्या भूकंपाचे धक्के पुन्हा सुरू असून मध्यंतरी भूकंपाचे प्रमाण कमी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता; मात्र आता डहाणू तलासरी भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भूकंपाचे केंद्र असलेल्या धुंदलवाडी पासून आजूबाजूच्या २० ते २५ किलोमीटर च्या परिघात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

सुरुवातीपासून आतापर्यंत २.५ ते ३.९ महत्तेचे (रिश्टर स्केल) धक्क्यांची नोंद असून काहीवेळा हे धक्के मोठ्या प्रमाणात बसत असून अनेक घरांच्या भिंतीना तडा जात आहेत. कालांतराने ती घरे कोसळताहेत. भूकंपामुळे घरांचे नुकसान झाले असून अनेकांना शासनाकडून मदत ही मिळाली आहे.

Recent Posts

कमी पाणी प्यायल्यामुळे होऊ शकतो किडनीचा हा गंभीर आजार

मुंबई: उन्हाळा असो वा थंडी प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीराच्या हिशेबाने भरपूर प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे.…

2 hours ago

Google Pixel 8a भारतात लाँच, ही आहे किंमत

मुंबई: Google Pixel 8a भारतात लाँच करण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये अनेक दमदार फीचर्स, जबरदस्त…

4 hours ago

DC vs RR: सॅमसंगचा वादग्रस्त झेल, दिल्लीसमोर राजस्थान फेल…

DC vs RR: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेला सामना दिल्लीसाठी खूपच महत्त्वाचा आहे.…

11 hours ago

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात शांततेत मतदान

महायुतीच्या कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह सिंधुदुर्ग : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात…

12 hours ago

देशात तिसऱ्या टप्प्यात ६१ टक्के तर महाराष्ट्रात ५४.०९ टक्के मतदान

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. यामध्ये १२ राज्ये आणि…

12 hours ago

कडिपत्ता खाण्याने दूर होतात हे आजार

मुंबई: कडिपत्त्याचे सेवन खाण्यापासून ते अनेक औषधांमध्ये केला जातो. यातील अनेक औषधीय गुण अनेक आजारांमध्ये…

12 hours ago