मुंबई: चेन्नई आणि मुंबई यांच्यात रविवारी रंगलेल्या सामन्यात चेन्नईने बाजी मारली. चेन्नईने मुंबईला विजयासाठी २०७ धावांचे आव्हान दिले होते. मात्र हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सला २० षटकांत केवळ ८ बाद १८६ धावाच करता आल्या. या पद्धतीने ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने हा सामना २० धावांनी आपल्या नावावर केला.
दरम्यान, मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. रोहितने ६३ बॉलमध्ये १०५ धावांची खेळी केली. यावेळी त्याने ११ चौकार आणि ५ षटकार ठोकले. मात्र त्याचे हे शतक मुंबईचा पराभव टाळू शकले नाही.
खरंतर, रोहित शर्माला इतर फलंदाजांची साजेशी साथ मिळू शकली नाही. रोहित शर्माने एक बाजू लावून धरली. मात्र दुसऱ्या बाजूने नियमित अंतराने फलंदाज बाद होत होते. तिलक वर्माने २० बॉलमध्ये ३१ धावांची खेळी केली. तर इशान किशनने १५ बॉलमध्ये २३ धावा केल्या. सूर्यकुमार यादव कोणतीही धाव न घेता बाद झाला. याशिवाय टीम डेविड आणि रोमरिया शेफर्ड या फलंदाजांनी निरााशा केली.
आता चेन्नई सुपर किंग्सचे ६ सामन्यातून ८ पॉईंट्स झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्सचे ६ सामन्यांत ४ पॉईंटस झालेत ते आठव्या स्थानावर आहेत. या सामन्याआधी हार्दिकचा संघ सातव्या स्थानावर होता.
मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…
देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…
कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…
अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत मागच्या महिन्यात एक महत्त्वाची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली, ती म्हणजे…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा मुंबई : महाराष्ट्रात चार चरणांच्या निवडणूक पूर्ण झाल्या आहेत. २०…