काँग्रेसने शाहू महाराजांचा राजकीय बळी दिला

Share

राजेश क्षीरसागर यांची टीका

कोल्हापूर : निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यात एकनाथ शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी कोल्हापूरच्या राजघराण्यावर गंभीर वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

राजेश क्षीरसागर हे कोल्हापूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी सतेज पाटील, सुषमा अंधारे यांच्यावर देखील टीका केली.

छत्रपती घराण्याचा मान कसा ठेवायचा, हे आम्हाला कोणीही शिकवू नये. संभाजीराजे छत्रपती यांचा मान आम्ही ठेवला आहे. काँग्रेसच्या नेत्यांना पराभव समोर दिसत असतानासुद्धा उमेदवारीची आपल्या गळ्यातील माळ शाहू महाराजांच्या (Shahu Maharaj) गळ्यात घातली. काँग्रेसने शाहू महाराजांचा राजकीय बळी देण्याचे काम केले आहे, असा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. सतेज पाटील घाणेरड राजकारण करत असतील तर कोल्हापूरची जनता माफ करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेला आले म्हणून त्यांचा जळफळाट का होतोय? ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी सभा घेतात त्या ठिकाणी उमेदवार निवडणून येतो, असा दावा राजेश क्षीरसागर यांनी केला.

छत्रपती घराण्याचा मान कसा ठेवायचा हे आम्हाला शिकवू नका. छत्रपती संभाजी यांचा मान आम्हीच ठेवला आहे. शाहू महाराजांनी राजकारणात पडू नये, असं आम्हाला वाटतं. छत्रपती पद हेच सर्वात मोठं पद आहे. मात्र आता शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

शाहू महाराजांना राजकीय बळी देण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे. छत्रपती घराण्याचे खरे वारसदार कोण? असा सवाल अनेकदा उपस्थित केला जात आहे. कदमबांडे यांची देखील चर्चा करण्यात आली. छत्रपती घराण्याने राजकारणात पडू नये म्हणून याआधीच मालोजीराजे आणि संभाजीराजे यांचा कोल्हापूरकरांनी पराभव केला. निवडणुकीमध्ये गादीचा अपमान होणार आहे मात्र असे करणाऱ्याला जनता माफ करणार नाही, असे राजेश क्षीरसागर म्हणाले.

एमआयएम पक्षाची कोल्हापूरमध्ये एकही शाखा नाही. कोण आहेत हे एमआयएमवाले? ते पुन्हा कोल्हापूरमध्ये आले तर आम्ही त्यांना फोडून काढू. आम्ही देखील हिंदू आहोत. सुषमा अंधारे हे फालतू, पेड बाई आहेत, असे म्हणत त्यांनी सुषमा अंधारेंवर देखिल टीका केली.

Recent Posts

पनीरच्या जागी आले चिकन सँडविच, छोटीशी चूक पडली महागात

मुंबई: ऑनलाईन डिलीव्हरीच्या वेळेस लहान-मोठ्या चुकांच्या तक्रारी येतच असतात. अनेकजण कंपनीकडे तक्रार करून अथवा सोशल…

32 mins ago

MPSC: राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा ६ जुलैला

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून(MPSC) घेतली जाणारी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा शनिवारी ६ जुलैला…

2 hours ago

Health: उन्हाळ्यात पायांची जळजळ होते का? करा हे उपाय

मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला बऱ्याच आजारांना तोड द्यावे लागते. एकतर उन्हामुळे शरीराची लाही होत असते.…

2 hours ago

IPL: हैदराबादच्या विजयाने मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

मुंबई: सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपरजायंट्सला १० विकेटनी हरवले. या विजयासह हैदराबादचे १४ अंक झाले आहेत…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दि. ९ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध प्रतिपदा ०६.२३ पर्यंत. नंतर द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र कृतिका.…

5 hours ago

लालूंचे मुस्लीम प्रेम; इंडिया आघाडीला धास्ती

देशात तिसऱ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. भाजपा विरुद्ध इंडिया आघाडीच्या लढाईत आता आरक्षणाचा…

8 hours ago