विस्तारवादी चीनकडून ‘चिकन नेक’जवळ आगळीक

Share

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एका बाजूला भारतासोबत लडाखमधील सीमा प्रश्नावर चर्चा सुरू असताना दुसरीकडे चीनची विस्तारवादी भूमिका कायम असल्याचे समोर आले आहे. भारतासाठी रणनीतिकदृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या ‘चिकन नेक’ जवळ चीनने आगळीक केली आहे. भूटानच्या बाजूने असलेल्या डोकलामजवळ चीनने एक गाव वसवले असल्याचे संकेत देणारे सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. हे फोटो मेक्सर कंपनीने घेतले आहे. मेक्सर कंपनी अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

डोकलाम ट्राय-जंक्शनवर वर्ष २०१७ मध्ये भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. जवळपास ७३ दिवस तणाव कायम होता. त्यावेळी चीनने डोकलाम भागात रस्ता निर्मितीचे काम हाती घेतले होते. त्यावेळी भूतानने आक्षेप घेत विरोध केला होता. नवीन सॅटेलाइट फोटोनुसार, अमो चू नदीच्या खोऱ्याजवळ चीन गाव वसवत आहे. या ठिकाणचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. त्याशिवाय, चीनने दक्षिण क्षेत्रात तिसरे गाव वसवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. फोटोमध्ये सहा इमारतींचा पाया रचला असल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय, इतर बांधकामेही सुरू असल्याचे फोटोत दिसत आहे.

अमेरिकन कंपनी मेक्सरने घेतलेल्या सॅटेलाइट फोटोच्या आधारे ‘एनडीटीव्ही’ ने वृत्त दिले आहे. या सॅटेलाइट फोटोत गावातील प्रत्येक घराच्या दरवाजाजवळ एक कार उभी असल्याचे दिसते. या नव्या फोटोबाबत भारतीय लष्कराने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

डोकलाम हा भारत-चीन आणि भूतानमधील ‘ट्रायजंक्शन’ तिन्ही देशांना जोडणारा मध्य भाग आहे. ‘चिकननेक’ म्हणून ओळखला जाणारा भाग हा पश्चिम बंगालपासून केवळ ४२ किलोमीटर दूर आहे. शिवाय, यामुळे सिलीगुडी कॉरिडॉरमधील भारतीय मनुष्यवस्ती असलेल्या जवळपास ३५ ते ४० किलोमीटरच्या भागावरही याचा परिणाम होऊ शकतो. विशेष म्हणजे, याच बाजूला नेपाळची सीमाही आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीत चीनच्या या रस्त्याचा भारताला सर्वात मोठा धोका आहे.

Recent Posts

DC vs RR: सॅमसंगचा वादग्रस्त झेल, दिल्लीसमोर राजस्थान फेल…

DC vs RR: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेला सामना दिल्लीसाठी खूपच महत्त्वाचा आहे.…

44 mins ago

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात शांततेत मतदान

महायुतीच्या कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह सिंधुदुर्ग : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात…

2 hours ago

देशात तिसऱ्या टप्प्यात ६१ टक्के तर महाराष्ट्रात ५४.०९ टक्के मतदान

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. यामध्ये १२ राज्ये आणि…

2 hours ago

कडिपत्ता खाण्याने दूर होतात हे आजार

मुंबई: कडिपत्त्याचे सेवन खाण्यापासून ते अनेक औषधांमध्ये केला जातो. यातील अनेक औषधीय गुण अनेक आजारांमध्ये…

2 hours ago

काँग्रेसकडून कसाबचे समर्थंन हे देशासाठी धोकादायक

पंतप्रधान नरेंद्र मोदींने ओढले काँग्रेसच्या पाकिस्तानधार्जिण्या भूमिकेवर आसूड नगर : मुंबईवर झालेल्या २६/११ सागरी हल्ला…

3 hours ago

मतांच्या लाचारीमुळे उद्धव ठाकरे बसले गप्प; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

मुंबई : पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? असा सवाल आता…

4 hours ago