Categories: क्रीडा

नेतृत्वबदल, फलंदाजांच्या अपयशामुळे चेन्नई एक्स्प्रेसचा वेग हरवला!

Share

ज्योत्स्ना कोट-बाबडे

मुंबई : गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जसाठी यंदाचा हंगाम निराशाजनक राहिला. चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जने सलग ४ सामने गमावल्यानंतर आरसीबीविरुद्ध ५व्या सामन्यात पहिला विजय मिळवला. एकूण १४ पैकी १० सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे. चेन्नईसाठी कोणत्याही आयपीएल हंगामातील ही सर्वात खराब कामगिरी आहे. हंगाम सुरू होतानाच अचानक केलेला कर्णधारपदावरील बदल चेन्नईच्या विरोधात गेला. या आयपीएल मोसमाच्या सुरुवातीला चेन्नईने एमएस धोनीऐवजी रवींद्र जडेजाला कर्णधार बनवले होते; परंतु हा निर्णय संघाला फारसा रुचला नाही आणि त्यांना सलग ४ सामन्यांत पराभव पत्करावा लागला.

जडेजा अधिकृतपणे कर्णधार झाला असला, तरी धोनीच मैदानावर कर्णधार झालेला दिसून आला. कर्णधारपद न पेलवल्याने तसेच खेळावर परिणाम झाल्याने रवींद्र जडेजाने कर्णधारपद सोडले. अन् कमान पुन्हा धोनीकडे आली. भरवशाचा फलंदाज फाफ डु प्लेसिसला रिटेन न करून चेन्नईने मोठी चूक केली. या मोसमात त्याची उणीव त्यांना जाणवत आहे. डू प्लेसिस हा गेल्या अनेक सत्रांपासून चेन्नईच्या फलंदाजीचा एक मजबूत भाग होता, पण चेन्नईने त्याला या मोसमासाठी सोडले आणि आरसीबीने त्याला ७ कोटी रुपयांना विकत घेतले.

चहरला चेन्नईने १४ कोटी रुपयांना खरेदी केले. पण त्याचा फायदा त्यांना मिळू शकला नाही. या हंगामात दीपक चहरची कमतरता चेन्नई सुपरकिंग्जला सर्वात जास्त जाणवत आहे. दुखापतीमुळे सुरुवातीचे सामने खेळू न शकलेला चहर नंतर पाठीच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला. चहरच्या गैरहजेरीत चेन्नईचा संघ पॉवरप्ले ओव्हर्समध्ये विकेट्स घेण्यासाठी धडपडताना पहायला मिळाला. तसेच चहर हा खालच्या क्रमवारीत झटपट धावा करूनही संघाला मदत करत आला आहे.

पहिल्या सीझनपासूनच सुरेश रैना हा चेन्नईचा अविभाज्य भाग राहिला आहे. पण या आयपीएल लिलावात चेन्नईसह कोणत्याही संघाने त्याला विकत घेतले नाही. रैनाच्या अनुपस्थितीचा परिणाम चेन्नईच्या फलंदाजीवर स्पष्टपणे दिसून आला. आयपीएलमध्ये ५५०० हून अधिक धावा करणाऱ्या रैनाच्या अनुपस्थितीत चेन्नईच्या मधल्या फळीत तसे कौशल्य दिसून आले नाही. संकटमोचक सुरेश रैना नसल्याचा फटका चेन्नईला नक्कीच बसला. ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा यांसारख्या स्टार फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनेही यंदाच्या मोसमात चेन्नईच्या अडचणीत भर घातली. ऋतुराज आणि उथप्पा या सलामीवीरांच्या कामगिरीत सातत्य नसल्याचा परिणाम चेन्नईच्या सलामीवर दिसून आला.

गेल्या दोन हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या ऋतुराजने यंदाच्या मोसमात नाराज केले. या मोसमात सुरुवातीच्या ५ सामन्यांत अनुक्रमे ०,१,१,१६ आणि १७ धावा केल्या आहेत. त्याचवेळी आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ८८ धावा करून विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या उथप्पाने त्या सामन्याव्यतिरिक्त पहिल्या पाच सामन्यात अनुक्रमे ५०, १२, १५ आणि २८ अशा धावा केल्या आहेत.

Recent Posts

Jio चा शानदार प्लान, एकदा रिचार्ज करा मिळवा ७३० जीबी डेटा

मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची…

1 hour ago

उन्हाळ्यात मध खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे

मुंबई: मध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मधामध्ये व्हिटामिन, मिनरल्स आणि अँटीव्हायरल गुण आढळतात. उन्हाळ्यात…

2 hours ago

IPL 2024: प्लेऑफचे सामने कुठे आणि कधी रंगणार? कोणत्या संघामध्ये होणार सामना घ्या जाणून

मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द होण्यासोबतच आयपीएलच्या लीग सामन्यांची सांगता…

3 hours ago

Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, अनेक दिग्गज मैदानात

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या पाचव्या टप्प्यात आठ राज्यातील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी…

4 hours ago

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

18 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

19 hours ago