ड्रग्ज प्रकरणात भारती सिंग-हर्ष लिंबाचियाविरुद्ध आरोपपत्र दाखल

Share

मुंबई : कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्याविरुद्ध एनसीबीने आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र ड्रग्ज प्रकरणी करण्यात आले आहे. या दोघांविरुद्ध न्यायालयात २०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. २०२० मध्ये दोघांना एनसीबीने अटक केली होती. दोघेही जामिनावर बाहेर असले तरी जून २०२० मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जच्या सेवनाची अनेक प्रकरणं समोर आली होती. एनसीबीने तपास सुरू केला तेव्हा अनेक बडे सेलिब्रिटी यात अडकले होते.

एनसीबीने ड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खानसह अनेक बड्या सेलिब्रिटींची चौकशी केली होती. याच क्रमाने, एनसीबीने नोव्हेंबर २०२० मध्ये भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या कार्यालयावर आणि घरावर छापे टाकले. यावेळी त्याच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला. यानंतर एनसीबीने भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाला अटक केली होती.

एनसीबीने हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंगला न्यायालयात हजर केले आणि त्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान त्याननंतर १५ हजार रुपये भरुन जामीन मंजूर झाला. तेव्हापासून दोघेही बाहेर आहेत. मात्र, फिर्यादीचे म्हणणे न ऐकता जामीन मंजूर करण्यात आल्याचा दावा एनसीबीने न्यायालयात केला होता.

Recent Posts

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपमध्ये एकत्र खेळणार भारत-पाकिस्तानचे खेळाडू

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) साठी आता चाहत्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही.…

8 mins ago

SAIL Recruitment : आनंदाची बातमी! युवकांना मिळणार भारतातील ‘या’ मोठ्या कंपनीत काम करण्याची संधी

लवकरच करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : सध्या अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. अशाच…

2 hours ago

Nitesh Rane : भाजपाच्या जाहिरातीमुळे पाकिस्तानी काँग्रेसच्या नेत्यांना हिरव्या मिरच्या झोंबल्या!

संजय राऊत हा महाराष्ट्राचा बिलावल भुट्टो पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या काँग्रेसला आमदार नितेश राणे यांचा दणका…

2 hours ago

Devendra Fadnavis : पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या? कुठे जाणार होते? सत्य बाहेर आले तर बिंग फुटेल!

देवेंद्र फडणवीसांचा अमोल कोल्हेंना इशारा शिरुर : पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या? कुठे जाणार…

2 hours ago

बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतले असते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका काँग्रेसने २६/११ हल्ल्यातील शाहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना…

3 hours ago

Dombivali news : पती-पत्नीमधील वाद सोडवणार्‍यांनाच संपवलं; दोन वेगवेगळ्या हत्यांनी डोंबिवली हादरलं!

डोंबिवली : संसार म्हटला की वाद, मतभेद होतातच. पण हे वाद जर प्रचंड टोकाला गेले…

3 hours ago