Bharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो यात्रेच्या मार्गात बदल करणं पडलं महागात; आसाममध्ये तक्रार दाखल!

Share

‘गांधी कुटुंबच सर्वात भ्रष्ट’ आसामच्या मुख्यमंत्र्यांची टीका

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या (Bharat Jodo Nyay Yatra) विरोधात गुरुवारी आसाम (Assam) पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिलेली नसतानाही यात्रेच्या मार्गात बदल केल्याने पोलिसांनी ही तक्रार दाखल केली आहे. ही यात्रा शहरांच्या मध्यभागातून न काढता त्यासाठी पर्यायी मार्ग वापरा, हट्ट धरण्यात आला तर पोलिसांची फौज देखील तयार असेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मात्र त्याचे पालन न झाल्याने या यात्रेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान ही यात्रा आता नागालँडमधून आसाममध्ये पोहचली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने काँग्रेसकडून ही यात्रा देशभरात आयोजित केली आहे. मात्र, आसाममध्ये या यात्रेला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे इतर राज्यांतही यात्रा आयोजित करताना काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत.

आसाममध्ये यात्रा रवाना होताच राहुल गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, कदाचित देशातलं सर्वात भ्रष्ट सरकार आणि सगळ्यात भ्रष्ट मुख्यमंत्री या राज्यात आहे. यावर हिमंता बिस्वा सरमा यांनीही तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘गांधी कुटुंबच देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. ही राहुल गांधींची ‘न्याय यात्रा’ नसून ‘मियाँ यात्रा’ आहे. जिथे जिथे मुस्लिम आहेत तिथे ते जातात’, अशी टीका त्यांनी केली. ‘मियां’ हा मूलतः आसाममधील बंगाली भाषिक मुस्लिमांसाठी वापरला जाणारा अपमानास्पद शब्द आहे.

Recent Posts

Job Recruitment : युवकांना भरघोस पगाराची नामीसंधी! ‘या’ विभागात रिक्त पदांची भरती

लवकरच करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : सध्या अनेक युवक सरकारी तसेच भरघोस…

2 hours ago

Air India News : प्रवाशांची गैरसोय! एअर इंडियाची चक्क ७० हून अधिक उड्डाणे रद्द

जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? मुंबई : अलीकडे झालेले विस्तारा एअरलाइनवरील संकट निवळले नसून इतक्यात…

3 hours ago

BMC News : होणार कायापालट? बीएमसीतर्फे ‘या’ धोकादायक इमारतींची यादी जाहीर

तब्बल १८८ इमारतींचा समावेश, जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : पावसाळा तोंडावर येताच मान्सूनपूर्व कामांना…

4 hours ago

कमी पाणी प्यायल्यामुळे होऊ शकतो किडनीचा हा गंभीर आजार

मुंबई: उन्हाळा असो वा थंडी प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीराच्या हिशेबाने भरपूर प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे.…

7 hours ago

Google Pixel 8a भारतात लाँच, ही आहे किंमत

मुंबई: Google Pixel 8a भारतात लाँच करण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये अनेक दमदार फीचर्स, जबरदस्त…

8 hours ago

DC vs RR: सॅमसंगचा वादग्रस्त झेल, दिल्लीसमोर राजस्थान फेल…

DC vs RR: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेला सामना दिल्लीसाठी खूपच महत्त्वाचा आहे.…

16 hours ago