नवी दिल्ली : “आता साखर उद्योग आणि सहकार क्षेत्र’ यावरच चर्चा झाली असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होईल, असे स्पष्ट केले.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही
माहिती दिली.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बैठकीसाठी दिल्लीत बोलावले होते. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना अनेक अडचणी येत असल्याच्या बातम्यांचा आढावा घेता अमित शहा यांनी सहकार क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुजय विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, अभिमन्यू पवार, धनंजय महाडिक हे सुद्धा नेते दिल्लीत अमित शहा यांच्या कार्यालयात दाखल झाले होते. या बैठकीनंतर अमित शहा यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही बैठक झाली. या बैठकींमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
यावेळी शिंदे यांनी अमित शहा यांचे आभार मानत महाराष्ट्रातील साखर उद्योगांसंदर्भात बैठक घेतली. यावेळी मार्जिंग आणि वर्किंग कॅपिटल, इनकम टॅक्सचे पेंडिंग विषय, लोनचा विषय, या विषयांचा आढावा घेत साखर उद्योगातील अडचणी आणि त्यांना सशक्त करण्यासाठीच्या योजनांवर अतिशय सकारात्मक चर्चा झाली, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…