कल्याण (वार्ताहर) : जम्मू-काश्मिरमध्ये असलेली शांतता दहशतवाद्यांना सहन होत नसून त्यांच्याकडून सर्वसामान्य लोकांवर होणारे हल्ले यातच दशतवाद्यांची निराशा दिसून येत आहे. त्यामुळे पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या नापाक योजना कधीही यशस्वी होणार नाहीत असे प्रतिपादन भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केले.
काश्मीरमधील दोन शिक्षकांची दहशतवाद्यांकडून हत्या झाली. या घटनेच्या निषेधार्थ कल्याणमधील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राजवळ निषेध व्यक्त करण्यात आला. भाजप शहर सचिव राजेश सिंग यांनी आयोजित केलेल्या या निषेध मोर्चात भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेलार, उत्तर भारतीय मोर्चाचे शहर सचिव अश्विन शुक्ला, उपाध्यक्ष सच्चीदानंद दुबे, अजय गुप्ता, वॉर्ड क्र ४ अध्यक्ष नीरज मिश्रा, ललित सारंग, भास्कर तीठे, राजकुमार सारस्वत, किशोर चौधरी, आलोक उपाध्याय, प्रा. आर आर त्रिपाठी, दीनानाथ तिवारी, श्रीकांत उपाध्याय, सी एस पांडे, राम अवध यादव, पी पी सिंग, श्रीनाथ सिंग, प्रमोद सिंग यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक कचरा किंवा कचरा व्यवस्थापन ही देशातील मोठी समस्या आहे. दिल्ली, मुंबईसारख्या…
रवींद्र तांबे दिनांक २० एप्रिल, १९३८ रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार…
मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता.…
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना…
पुण्यात विनोद तावडे यांचं वक्तव्य पुणे : एनडीए सरकारची (NDA) दहा वर्षाची कामगिरी आणि २०४७…
मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून…