MLA Nitesh Rane Facebook Live : उद्धव ठाकरे पळून गेले काय? तारीख पे तारीख देतायत….नेमके परत कधी येणार?

Share

सामना अग्रलेखातील भाजपवरील टीकेवर नितेश राणे यांचा जोरदार प्रहार

MLA Nitesh Rane Facebook Live: संजय राजाराम राऊत यांनी हिम्मत असेल तर सुप्रिया सुळे यांनी गद्दारांवर केलेल्या वक्तव्यावर अग्रलेख लिहून दाखवावा. पण सिल्वर ओकवरुन अर्धा पगार येतो त्यामुळे ते हे धाडस करणार नाहीत, अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सामनाच्या आजच्या अग्रलेखावर प्रहार केला.

ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या कानाला त्रास होतोय म्हणून टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी लक्षात घ्यावे की त्यांच्या मालकाची मान ही दिल्लीसमोर वाकुन-वाकुन दुखतेय त्यामुळे त्याची सर्जरी करावी लागली. भाजपाच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची ईडी आणि सीबीआय चौकशीची मागणी करता तशी नंदकिशोर चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे यांना किती खोके दिले या चौकशीचीही मागणी करा ना. त्याच्यावरही एक अग्रलेख लिहा ना. उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याचीही चौकशी करा.

नंदकिशोर चतुर्वेदीचं प्रकरण बाहेर निघताच उद्धव ठाकरे हे त्यांच्या परिवारासह पळून गेले आहेत अशी बातमी आमच्या कानावर आली आहे. आधी ९ तारखेला येणार होते नंतर १२ तारखेला पण ठाकरे परिवार आता भारतात परत येणार नाही अशीच बातमी आहे. तसंच ते आता मौनीबाबा होऊन बसले आहेत अशी टीकाही नितेश राणे यांनी केली. आमच्या जाहिरातीवर बोलण्याआधी मुख्यमंत्री असताना उत्कृष्ट मुख्यमंत्र्याचा सर्वे कर्जतच्या फार्महाऊसवरुन केला होता का असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, बाळासाहेबांचा तुम्हाला आता खुप पुळका येतो. पण आज सकाळी मी ट्वीटरवर जाहिरात टाकली आहे ती पाहिली का? त्या वज्रमुठ सभेच्या जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो कुठे आहे? मुंबईत जेव्हा पावासाने पाणी भरलेलं तेव्हा उद्धव ठाकरे बाळासाहेबांना टाकून आलिशान हॉटेलमध्ये राहायला गेले होते. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी उद्धव ठाकरे बाहेरगावी पार्ट्या करत होते. पण उद्धव ठाकरे त्यांचा म्हातारा म्हणून उल्लेख करायचे. रश्मी ठाकरे यांनी त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणण्याचेही सोडले होते, अशा शब्दांत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचे वाभाडे काढले.

कान टोचले!

यावेळी नितेश राणे यांनी संजय राऊत सारख्या घरफोड्या माणसाला त्याचा धंदा चालवण्याची संधी देऊ नये. देवेंद्रजी आणि एकनाथजींच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार उत्तम चाललं आहे असा टोला लगावला.

Recent Posts

JEE Advanced परिक्षेसाठी आज मिळणार प्रवेशपत्र!

जाणून घ्या प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया चेन्नई : JEE Advanced 2024 म्हणजेच, संयुक्त प्रवेश…

2 hours ago

Weather Update : उन्हाचा चटका कमी होणार! महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा कायम

'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली…

2 hours ago

HSC आणि SSC बोर्डाच्या परिक्षांच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट!

कधी जाहीर होणार निकाल? मुंबई : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच CBSE बोर्डाच्या दहावी आणि…

2 hours ago

Singapore News : कंपनी झाली मालामाल! बोनस म्हणून कर्मचाऱ्यांच्या हाती चक्क ८ महिन्यांचा पगार

जाणून घ्या नेमकं कसं उजळलं कर्मचाऱ्यांचं नशीब सिंगापूर : साधारणत: कंपन्यांकडून सणासुदीला किंवा नवीन वर्षाच्या…

3 hours ago

Amit Shah : पराभव झाल्यास भाजपाला ‘प्लॅन बी’ची गरज? काय म्हणाले अमित शाह?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या विजयासाठी जोरदार तयारी करत…

3 hours ago

Chandrashekhar Bawankule : भगव्या ध्वजाला फडकं म्हणणं हा उद्धव ठाकरेंचा नतद्रष्टेपणा!

सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भगव्याचा अवमान केला चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात मुंबई :…

3 hours ago