मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून महायुती सरकारने मुंबईत चांगली कामे केली आहेत. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी केलेले काम लोकांसमोर आहे. महायुतीने केलेल्या कामांची पावती जनता देईल. पियुष गोयल यांच्यासह मुंबईतील सर्व जागा महायुती नक्की जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
उत्तर मुंबईचे भाजपाकडून उमेदवारी देण्यात आलेल्या पियुष गोयल यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी मुंबईत विजयाचा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेकडून मुंबईत तीनही उमेदवार मराठी दिलेले आहेत. पियुष गोयल मुंबईकर आहेत. त्यामुळे पियुष गोयल अमराठी आहेत, अशा प्रकारचा आक्षेप घेता कामा नये. कोणालाही तसा आक्षेप घेण्याचा अधिकार नाही. पियुष गोयल प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
गेल्या २५ वर्षांत जेवढे काम झाले नाही, तेवढे काम दोन वर्षांत करण्याचा प्रयत्न महायुती सरकारने केला आहे. या कामांचा परिणाम या निवडणुकीतून नक्की दिसून येईल, असे सांगत आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांच्या काळात किती झाडे कापली गेली, याचा हिशोब त्यांनी आधी द्यायला हवा. त्यांची सत्ता येणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात फिरणे, अशी गत आहे, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
हत्येमागील कारण ऐकून पोलीसही हादरले लखनऊ : भावाबहिणीचं नातं हे पवित्र मानलं जातं. आईबाबांनंतर काळजी…
संजय राऊतांच्या टीकेवर मनसेचे संदीप देशपांडे यांचे प्रत्युत्तर मुंबई : मनसेने महायुतीला (Mahayuti) जाहीर पाठिंबा…
संजय राऊतांच्या आरोपांवर शिवसेना व भाजपा नेत्यांचा पलटवार नेमकं प्रकरण काय? मुंबई : विद्यमान मुख्यमंत्री…
शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेल्याचा केला होता अनिल देशमुखांनी खळबळजनक दावा…
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे…
मध्यरात्री नेमकं काय घडलं? पुणे : पुण्यात गुन्हेगारीची (Pune Crime) समस्या अत्यंत गंभीर बनत चालली…