मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Aarkshan) मुद्दा प्रचंड तापला असून ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटत आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांनी पाणी व उपचार घेणे टाळल्याने त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. यामुळे सरकारच्या हालचालींनाही वेग आला आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसिमितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे, कारण यानंतर मुख्यमंत्री जरांगेंची भेट घेण्याकरता थेट जालन्यात अंतरवाली सराटी येथे दाखल होणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू आहे. कुणबी नोंदणी आढळणाऱ्यांना आरक्षण देण्यात येण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनाच आरक्षण दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून त्यांनी नियोजित केलेल्या समितीच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे.
बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार आहेत, तर मुख्यमंत्री जरांगेंच्या भेटीसाठी रवाना होणार आहेत. बैठकीनंतर चंद्रकांत पाटील मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. हा निर्णय नेमका काय असेल याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राजकीय सारीपाटावरील वाटचाल पाहता त्यांच्याबाबतीत ‘कोण होतास तू, काय झालास…
सेवाव्रती: शिबानी जोशी ठाण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा ज्या ठिकाणी सुरू झाली, ते ठिकाण…
प्रा. डॉ. विजयकुमार पोटे दोनशे रुपये लिटर दूध, पैसे मोजूनही न मिळणारे पीठ, जीवनावश्यक वस्तूंचा…
मुंबई: आयपीएल २०२४चा प्लेऑफचा टप्पा २१ मेपासून सुरू होत आहे. सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स,…
मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा…
मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…