नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी(rahul gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत(pm narendra modi) केलेल्या अपमानजनक विधानाबाबत निवडणूक आयोगाने गुरूवारी झटका दिला. या प्रकरणी आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवत शनिवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.
भाजपने बुधवारीच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली होती. पार्टी सचिव राधा मोहन दास अग्रवाल आणि एका अन्य पदाधिकारी ओम पाठसह प्रतिनिधीमंडळामध्ये सामील इतर नेत्यांनी राहुल गांधीचे हे विधान अपमानजनक असल्याचे म्हटले होते.
राहुल गांधी यांनी क्रिकेट विश्वचषकाच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या पराभवानंतर पंतप्रधान मोदींबद्दल अपमानजनक विधान केले होते. भारताने ५० षटकांत २४० धावा केल्या होत्या मात्र ऑस्ट्रेलियाने केवळ ४३ षटकांत भारताने दिलेले आव्हान पूर्ण करत सामना जिंकला होता.
मुंबई: उन्हाळा असो वा थंडी प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीराच्या हिशेबाने भरपूर प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे.…
मुंबई: Google Pixel 8a भारतात लाँच करण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये अनेक दमदार फीचर्स, जबरदस्त…
DC vs RR: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेला सामना दिल्लीसाठी खूपच महत्त्वाचा आहे.…
महायुतीच्या कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह सिंधुदुर्ग : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात…
मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. यामध्ये १२ राज्ये आणि…
मुंबई: कडिपत्त्याचे सेवन खाण्यापासून ते अनेक औषधांमध्ये केला जातो. यातील अनेक औषधीय गुण अनेक आजारांमध्ये…