मुंबई: लोकांना पोटधरून हसवणारी कॉमेडियन भारती सिंहने (bharti singh) नुकतीच आपली फी घटल्याबद्दलचा खुलासा केला आहे. कॉमेडियनने सांगितले की आधीच्या तुलनेत तिच्या फीमध्ये आता मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने कमी फी मिळण्याबाबतचे कारण सांगितले.
भारतीय सिंहने नुकतीच फीमध्ये झालेल्या कपातीबाबद हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले. भारतीने सांगितले, कोरोना काळात शोच्या बजेटवर खूप परिणाम झाला. असे प्रत्येक इंडस्ट्री आणि बिझनेसमध्ये झाले. मात्र कोणालाही हे वाटणार नाही की त्याच्या टॅलेंटला कमी फी मिळावी. आधी मी एका शोसाठी जितकी रक्कम घेत होती त्यापैकी २५ टक्केही रक्कम आता मला मिळत नाही.
यासोबतच भारती म्हणाली, जर कोणी मला अर्धी रक्कम देत असेल तर मी काम करणार नाही. जर तुम्ही एखाद्या शोसाठी महिन्याचे २६ दिवस काम करायचे म्हणाल आणि रक्कम चांगली देत नसाल तर मी काम करणार नाही. मी माझ्या बाळाला १२-१२ तास एकट्याला सोडून येते. यासाठी मला माझ्या कामाचा योग्य मोबदला मिळायलाच हवा.
यासोबतच भारतीने म्हटले की मी असे नाही म्हणणार की मला आधी लाखो रूपये फी मिळत होती आणि मी आता ५० हजार घेत आहे. जेव्हा मी स्टेजवर येते तेव्हा मला लक्षातही नसते की मला या शोसाठी किती रूपये फी मिळते.
भारती सिंह अनेक रिअॅलिटी शो ऐवजी द कपिल शर्मा शोमध्येही दिसली आहे. या शोजव्यतिरिक्त ब्लॉग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
केंद्रीय मंत्र्यांवर देण्यात आली मोठी जबाबदारी मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) राजकीय पक्षांनी…
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणाच्या पाचव्या दिवशी लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांची मागणी जालना :…
१५ जणांचा मृत्यू तर ६० जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आज सकाळच्या सुमारास रेल्वे…
आदिवासी गरोदर महिलांची होणारी गैरसोय टळली मुरुड : दुर्गम ग्रामीण भागातील गरजू गरीब व आदिवासी…
हिट अँड रन प्रकरणाने उडाली खळबळ नागपूर : राज्यभरात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असून 'हिट…
ठाकरे-पवारांमध्ये नवा वाद रंगण्याची शक्यता पुणे : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi)…