
मुंबई: लोकांचा पगार झाला की तो कधी संपतो हे कळतच नाही. महिना अखेरीसपर्यंत खिशा पूर्ण रिकामा झालेला असतो. अशातच नोकरीपेशा लोकांसाठी बचत करणे कठीण होते.
तुम्ही ५०:३०:२०चा नियम वापरून भविष्यासाठी काही बचत करू शकता. ५०:३०:२०नियामाची सुरूवात अमेरिकेच्या सीनेट एलिझाबेथ वॉरेन यांनी केली होती.
त्यांनी आपला पगार तीन भागांमध्ये विभागला. यात गरज, इच्छा आणि बचत असे तीन भाग केले.
कमाईतील ५० टक्के भाग गरजेच्या कामांवर खर्च केला पाहिजे. कमाईतील ३० टक्के भाग आपल्या आवडीच्या वस्तूंवर खर्च करा. हे खर्च असे असतात जे टाळलेही जाऊ शकतात.
कमाईतील २० टक्के भाग बचतीसाठी राखीव ठेवला गेला पाहिजे. या फॉर्म्युल्यानुसार राहिले तर आपली बचतही होईल आणि भविष्यात पैशांची चणचण भासणार नाही.
नाहीतर अनेकदा लोक खर्चाच्या नावाने बचतच होत नाही अशी बोंब करत असतात. मात्र त्यांचे याकडे लक्ष नसते की वायफळ गोष्टींवरील खर्च आपला कमी केला जाऊ शकतो.