
मुंबई : गेल्या 25 वर्षात मुंबई महापालिकेत दीड लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे आम्ही यशवंत जाधव यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. महापालिकेत यशवंत जाधव, इकबाल सिंह चहल यांच्या रूपात सचिन वाझे बसले आहेत, असा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला.
''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा, तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही हे मुख्यमंत्र्यांनी काल 25 वर्षानंतर तरी स्वीकारले. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने टीका करणार नाहीत असं आम्हाला वाटलं होतं. पण काल त्यांनी टीका केल्यामुळे आम्हाला भूमिका बदलावी लागत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं श्रेय उद्धव ठाकरे घेत आहेत, अशी टीका अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.