Monday, May 5, 2025

क्रीडा

सुपर १२मधील चार संघांत भारताचा समावेश

सुपर १२मधील चार संघांत भारताचा समावेश

दुबई (वृत्तसंस्था) : टी २० वर्ल्डकपमध्ये पात्रता फेरीचे सामने सुरू असताना ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने उपांत्य फेरीबाबत भाकीत वर्तवले आहे. सुपर १२ मधील चार संघांना त्यांनी पसंती दिली आहे. ब्रॅड हॉगच्या मते उपांत्य फेरीत भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे पोहोचतील. हा वर्ल्डकप भारत किंवा पाकिस्तान जिंकेल असंही त्यांनी पुढे सांगितले. तर ऑस्ट्रेलिया संघाला त्यांनी पसंती दिलेली नाही.

माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांच्या यू-ट्यूब चॅनेलवर चर्चेदरम्यान हॉगने हे भाकीत वर्तविले आहे. माझ्या मते गट १ मधून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत पोहोचतील. तर गट २ मधून भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचतील, असे ब्रॅड हॉगने म्हटले आहे. पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो; मात्र यासाठी त्यांना भारताला पराभूत करावे लागेल, असे त्याने स्पष्ट केले.

भारताविरुद्धचा पहिला सामना गमवल्यास पाकिस्तानकडे न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकत पुनरागमन करण्याची खूप कमी संधी आहे. त्यामुळे थोडे गणित बदलेल. अशा परिस्थितीत पाकिस्तानला उपांत्य फेरीत स्थान मिळवणे कठीण आहे, असे ब्रॅड हॉगचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment